HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरुन उठवलं!

रत्नागिरी। नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना अखेर अटक करण्यात आली आहे. आधी नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. रत्नागिरी कोर्टाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. त्यानंतर आता अखेर नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. नारायण राणेंविरुद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. नाशिक आणि पुणे पोलिसांनी कोकणात पथकं पाठवली होती. त्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी राणेंना अटक केली. दरम्यान राणे यांना जेवत असताना मध्येच अटक करण्यात आली आहे.

राणे जेवण करत असताना पोलिसांनी त्यांचं जेवणाचं ताट खेचण्याचा प्रयत्न

यावेळी पोलिसांनी नारायण राणे यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आमदार प्रसाद लाड यांनी केलाय. इतकंच नाही तर राणे यांच्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोपही लाड यांनी केलाय. राणे जेवण करत असताना पोलिसांनी त्यांचं जेवणाचं ताट खेचण्याचा प्रयत्न केला. तसा एक व्हिडीओ आपण रेकॉर्ड केल्याचं लाड यांनी सांगितलं.

रत्नागिरी कोर्टाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला

नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत आहेत. नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. रत्नागिरी कोर्टाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. त्यानंतर आता अखेर नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. नारायण राणेंविरुद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. नाशिक आणि पुणे पोलिसांनी कोकणात पथकं पाठवली होती. त्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी राणेंना अटक केली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली खेचली असती अशी भाषा केल्याने नारायण राणेंविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अटक करण्यासाठी पोलीस पथकं चिपळूणकडे रवाना झाली. त्यातच युवासेना आणि शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत मुंबईतील नारायण राणे यांच्या घराकडे कूच केली. वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्त्वात युवासेनेचे कार्यकर्ते राणेंच्या बंगल्यावर निर्देशने केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात सामाजिक समता सप्ताह सुरु

News Desk

महाविकास आघाडी सरकारमुळे मराठा आरक्षण गमावले!

News Desk

शिवसेनेचे मंत्री फक्त पेन आणि फाईल उचलतात…

Arati More