HW News Marathi
देश / विदेश

शेतकऱ्यांना दिलासा ! खतांच्या किंमती पूर्ववत केल्याचं मोदींनी केलं जाहीर, पवारांच्या मागणीला यश?

नवी दिल्ली | केंद्रातील मोदी सरकारने शेतकर्‍यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. उच्चस्तरीय बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डाय अमोनियम फॉस्फेट खतावरील अनुदानात 140 टक्क्यांनी वाढ करत असल्याची घोषणा केली आहे. एका पोत्यावरील अनुदान आता 500 रुपयांऐवजी 1200 रुपये करण्यात आले आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे 2400 रुपयांऐवजी DAP खताची एक बॅग आता फक्त 1200 रुपयांत मिळणार आहे.

तौक्ते चक्रीवादळानं झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत परतले आणि खतांच्या किमतींबाबत त्यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली..आंतरराष्ट्रीय स्तरावर फॉस्फोरिक अॅसिड, अमोनिया इत्यादींच्या वाढत्या किमतींमुळे खतांचे दर वाढत असल्याची बैठकीत चर्चा झाली. आंतरराष्ट्रीय किमती वाढल्या असल्या तरी जुन्या दराने शेतकर्‍यांना खत मिळाले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधोरेखित केले आहे.

 

शरद पवारांनी पत्र लिहीत केली होती मागणी

कोरोना संकट काळात रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा मोठा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर रासायनिक खतांचे वाढलेले दर केंद्र सरकारने कमी करावेत, अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी एका पत्राद्वारे आधी केली होती. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी संबंधित खात्याचे केंद्रीयमंत्री सदानंद गौडा यांना खत दरवाढीच्या विरोधात पत्र लिहिले होते.

पेट्रोलच्या किमती शंभर पार असताना केंद्र सरकारने खतांच्या किंमती वाढवून सामान्यांना वेठीस धरल्याची टीका होत आहे. एकीकडे कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकरी संकटात असताना खतांच्या किंमतीत वाढ करुन शेतकऱ्यांना आणखी संकटात टाकण्याचं काम केंद्र सरकारने केलं आहे.

संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केंद्र सरकारने केलं

माजी कृषिमंत्री शरद पवार यांनीही या दरवाढीची दखल घेत केमीकल आणि फर्टीलायजर मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे. तसेच, या दरवाढीकडे आपण गांभीर्याने पाहून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंतीही केली आहे. लॉकडाऊनमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केंद्र सरकारने केलंय. केंद्राचा हा निर्णय अतिशय धक्कादायक असून तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा, असेही त्यांनी सूचवले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रसिध्द पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे निधन

News Desk

लष्करातील महिलांना स्थायी कमिशन लागू 

swarit

राजगृह म्हणजे आमची अस्मिता, ‘त्या’ माथेफिरूना अटक करून कठोर कारवाई करा – धनंजय मुंडेंची गृहमंत्री अनिल देशमुखांना मागणी

News Desk