HW News Marathi
Covid-19

कोरोनाच्या पहिल्या लाटेतच भारताने लस तयार केली!

नवी दिल्ली | देशात कोरोना रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील अनेक जिल्ह्यांत कोरोनाची स्थिती चिंताजनक झाली आहे. महाराष्ट्रात देखील अत्यंत कठीण परिस्थितीला सरकारला, सामान्य जनतेला, आरोग्य यंत्रणेला सामोरे जावे लागत आहे. या सगळ्या मुद्द्यावर आज (२० एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. मोदींनी बोलायला सुरुवात करण्याआधी जी लोकं या कोरोना महामारीत मारले गेले त्या सगळ्यांना आदरांजली वाहिली. इतकचं नाही तर, डॉक्टर, नर्स, सगळे आरोग्य कर्मी, पोलीस या सगळ्यांनी कोरोना काळात जी कामगिरी केली त्याचे कौतुक केले.

पुढे मोदींनी भारतात सुरू असलेल्या लसीकरणावर भाष्य केले. जगात सर्वाधिक वेगाने भारतात लस तयार झाली. आणि लसीकरणात भारत अग्रेसर असल्याचे मोदींनी यावेळी बोलताना म्हटले आहे. तसेच, मजुरांनी जिथे असाल तिथेच राहण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

* देशभरात सध्या ऑक्सिजन मागणी प्रचंड प्रमाणात आहे. ऑक्सिजन साठा वाढण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे.

* गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली लढाई आणखी मजबूत करण्याची आवश्यकता

* औषधांचे उत्पादन वाढविण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जात आहे.

* औषधनिर्मितीचे प्रमाण वाढवले आहे.

* भारतात जगातील सर्वात स्वस्त लस, आपल्या शास्त्रज्ञांच्या मेहनतीचे फळ मिळत आहे.

* जगातील सर्वाधिक वेगाने लसीकरणाची मोहीम देशात सुरू.

* आजपर्यंत देशभरात १२ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण

* आधीच्या स्थितीत आपल्याकडे कोरोनासंबंधी कोणतीही आरोग्यविषयक माहिती नव्हती.

* आज ह्या स्थितीत सुधारणा. अनेकांचे आयुष्य वाचवले जात आहे.

* आरोग्य सुविधा कमी पडू देणार नाही.

* आपण मजबुतीने कोरोनाविरुध्दची लढाई लढली आहे.

* अर्थचक्र आणि उद्योगविश्व सुरू राहील असाच आमचा प्रयत्न

* आपल्याकडे उपचार, लस, कोविड सेंटर्स आहेत. कमी काळात मोठी आरोग्ययंत्रणा उभारली.

* मजुरांनी आहे तिथेच थांबावं स्थलांतर करू नये

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडे झाले भावूक ….असं काय झालं बीड जिल्ह्यात?

Arati More

लॉकडाऊनची भीती अजूनही टळली नाही – मुख्यमंत्री

News Desk

बबड्याची सिरिअल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर..रोहित पवारांचा शेलारांना टोला !

News Desk