HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणेंच्या अटकेचा आदेश काढणारे नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे राज ठाकरेंच्या भेटीला!

नाशिक। राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. पोलीस आयुक्त दीपक पांडेय हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले. राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, त्या हॉटेलमध्ये जाऊन पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. दीपक पांडे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश काढले होते.मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये काल बाचाबाची झाली होती. त्यानंतर पोलीस आयुक्त दीपक पांडेय हे राज ठाकरे यांना भेटण्यासाठी हॉटेल ssk वर दाखल झाले. पोलीस आयुक्त आणि राज ठाकरे यांच्यात काय चर्चा होणार याकडे नाशिककरांचं लक्ष लागलं आहे.

पोलीस आयुक्त दीपक पांडेय हे स्वत: हॉटेलवर आले

मनसे कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले त्याच्या समोर मनसैनिकांनी होर्डिंग लावले होते. त्यावर पोलीस आणि महापालिका प्रशासनाने कारवाई केली. इतकंच नाही तर गुन्हेही दाखल केले.राज ठाकरे आज आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी जाण्यापूर्वीच पोलीस आयुक्त दीपक पांडेय हे स्वत: हॉटेलवर आले आणि त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

गेल्या महिन्यापासून या निवडीची प्रक्रिया

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे 22 सप्टेंबरपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील पक्षसंघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसेने जोरदार तयारी सुरू केली आहे. यापूर्वी राज ठाकरे, अमित ठाकरे आणि पक्षांच्या इतर नेत्यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला होता. आता पुन्हा एकदा राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शाखा अध्यक्षांच्या नियुक्तीवर राज ठाकरे मान्यतेचा ठसा उमटिवणार असल्याचे समजते. मनसेमध्ये शाखा अध्यक्ष हे सर्वात महत्त्वाचे पद असून, गेल्या महिन्यापासून या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

राज्यात फेब्रुवारी 2022 मध्ये 18 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे. या निवडणुकांच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांचे नेते सक्रिय झाले आहेत. नववर्षांत पुन्हा एकदा निवडणुकाचा हंगाम असून, आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय धुळवडीची रंगत वाढणार आहे. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड या महापालकांमध्ये राजकीय नेत्यांच्या प्रचाराचा जोर जास्त असण्याची शक्यता आहे.

राज्यात फेब्रुवारी 2022 मध्ये 18 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे. या निवडणुकांच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांचे नेते सक्रिय झाले आहेत. नववर्षांत पुन्हा एकदा निवडणुकाचा हंगाम असून, आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय धुळवडीची रंगत वाढणार आहे. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड या महापालकांमध्ये राजकीय नेत्यांच्या प्रचाराचा जोर जास्त असण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी आम्ही केंद्राच्या पाया पडायलाही तयार!

News Desk

पॅन कार्ड,आधार कार्ड ऑनलाईन जोडा

News Desk

कर्जमाफी झालेल्या शेतक-यांकडून व्याज घेऊ नका , बॅंकाना आदेश- मुख्यमंत्री

News Desk