HW News Marathi
महाराष्ट्र

‘जिल्हाधिकारी कोण असावा हे मी ठरवत नाही’, नवाब मालिकांचं स्पष्टीकरण

मुंबई | आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीत मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप असतो हे परभणीतील प्रकाराने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. “आयएएस आधिकारी आंचल गोयल यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्विकारावा. त्यांना रुजू करुन घ्यावे”, अशी मागणी करत परभणीच्या जागरुक नागरिक आघाडीने आज राज्य शासनाविरोधात निदर्शने दिली. परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर आयएएस अधिकारी आंचल गोयल या जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार होत्या. त्यांचा फोटोही सर्व वर्तमानपत्रात झळकला. त्या चार दिवस अगोदर परभणीला आल्याच्या बातम्या देखील प्रसारित झाल्याच होत्या.

निर्णय आहेत ते मुख्यमंत्री घेत आहेत

आयएएस अधिकारी बदलीचं प्रकरण चांगलंच पेटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मालिकांनी आता त्यांचं मत यावर स्पष्ट केलं आहे. जिल्हाधिकारी कोण असावा हे मी ठरवत नाही, आंचल गोयल या मला बोलूनच परभणीमध्ये गेल्या होत्या. पण त्यांना का रुजू होऊ दिलं नाही याबद्दल मला माहिती नाही. आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारितून होतात. जीएडी मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत आहे. काही अज्ञानी आणि लोक माझ्यावर आरोप करत आहेत ते चुकीचे आहेत, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

झ्या दोन्ही खात्यामध्ये महिला सचिव आहेत. त्यामुळे महिलांना काम करू दिलं जात नाही हा आरोप चुकीचा आहे. काल मुख्य सचिवांशी या विषयावर मी बोललो ते त्याबद्दल खुलासा करतील, असं ते म्हणाले. जिल्हाधिकारी कोण असावा हे मी ठरवत नाही, आंचल गोयल या मला बोलूनच परभणी मध्ये गेल्या होत्या. पण त्यांना का रुजू होऊ दिलं नाही याबद्दल मला माहिती नाही. मीच त्यांना परभणी मध्ये जाण्यासाठी सांगितलं होतं, पण शेवटच्या दिवशी काय झालं याची मला कल्पना नाही. यासंदर्भात जीएडीचे लोक तुम्हाला उत्तर देऊ शकतील. महिला अधिकाऱ्यांच्या बाबतीत असं झालं, तसं झालं बोलणे योग्य नाही हा विषय माझ्या अखत्यारित नाही. जे काही निर्णय आहेत ते मुख्यमंत्री घेत आहेत, असं मलिक म्हणाले आहेत.

काय आहे प्रकरण?

आंचल गोयल ३१ जुलैला दुपारपर्यंत पदभार घेणार असेच सर्वसामान्यांना वाटत होते. पण त्या दिवशी दुपारनंतर अचानक मुगळीकर यांनी राज्य शासनाच्या आदेशावरुन अतिरिक्‍त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे पदभार सोपविला. त्यामुळे जिल्ह्यात अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. जिल्ह्यातील काही नेतेमंडळींना आंचल यांचा धसका बसला असावा, त्यामुळेच त्यांनी त्यांना जिल्हाधिकारी होण्यापासून रोखलं, अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर परभणीच्या जागरुक नागरिक आघाडीने आंदोलन छेडले.

आयएएस आधिकारी तिचे सात-आठ महिन्याचे बाळ घेवून पदभार घेण्यासाठी येते

“आंचल गोयल यांना का रुजू करून घेतले नाही? त्या रुजू झाल्या तर कोणाचे हितसंबंध धोक्यात येणार होते? हे सर्वसामान्य जनतेला कळालेच पाहिजे. एक महिला, आयएएस आधिकारी तिचे सात-आठ महिन्याचे बाळ घेवून पदभार घेण्यासाठी येते आणि सर्व प्रस्थापित पक्षीय नेते मंडळी साटेलोटे असणाऱ्या अधिकाऱ्यांशी संगनमत करुन ती महिला पदभार कसा घेणार नाही, यासाठी वरिष्ठ स्तरावरुन डावपेच करतात. ही अत्यंत लांच्छनास्पद गोष्ट आहे. आंचाल गोयल यांना पदभार देण्यात यावा”, अशी मागणी आंदोलकांनी केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा डाव असून केंद्रसरकार नेमकं काम कुणासाठी करतंय – छगन भुजबळ

News Desk

उदयनराजे भोसले यांनी ‘या’ कारणासाठी घेतली शिवेंद्रराजे भोसले यांची भेट

News Desk

हिंगणघाट जळीत कांड : न्यायालयात पीडितेची बाजू वकील उज्जवल निकम मांडणार

swarit