HW News Marathi
महाराष्ट्र

कुणी कितीही टरटर केली तरी आकाश काही फाटणार नाही, नवाब मलिकांचे राणेंना प्रत्युत्तर

मुंबई | काल (२६ ऑक्टोबर) माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर भाजप नेत्यांनी पत्रकार परिषदा घेऊन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. या टीकेला नवाब मलिक यांनी चांगलेच उत्तर दिले आहे.

भाजपचे काही नेते मुख्यमंत्र्यांच्याबाबतीत अपशब्द वापरत आहेत. आणि एक मंत्री तुरुंगात जाणार असल्याचे भाकीत करत आहेत हे बोलणं योग्य नाही असे नवाब मलिक म्हणाले.सभ्य समाजात आणि राजकारणात असंसदीय शब्दांचा प्रयोग होत असेल तर तो चुकीचा आहे.

प्रत्येकाने मर्यादेत राहून भाषेचा प्रयोग केला पाहिजे असा सल्ला नवाब मलिक यांनी दिला आहे. कुणीही कितीही टरटर केली तरी आकाश काही फाटणार नाही आणि पाऊस काही पडणार नाही असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला आहे.

उद्धव ठाकरेंनी या वेळचा दसरा मेळावा मुलाला क्लिनचिट देण्यासाठी घेतल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. सुशांत सिंह राजपूतची प्रकरणी आदित्य ठाकरे कोठडीत जाईल, सत्तेचा दुरुपयोग करून स्वत:च्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न आहे. सुशांतच्या प्रकरणात त्याला मारलं, कशानं मारलं सर्व बाहेर येईल. दिशा सालियनवर बलात्कार कुणी केली, तिला वरून कुणी टाकलं, हे सर्व समोर येईल,असा गंभीर आरोप नारायण राणेंनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धक्कादायक ! मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर ‘त्या’ फाईलमधील मजकुरात परस्पर बदल ?

News Desk

‘आम्हाला फक्त ब्रम्हज्ञान त्यांच्यासाठी कोरडे पाषाण’, फडणवीसांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र!

News Desk

बकरी ईदच्या निमित्ताने उच्च न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

News Desk