HW News Marathi
देश / विदेश

राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही !

मुंबई | काही लोक भाषण ऐकायला येतात, तर काही फक्त बघायला येतात. आणि राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला. दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार घेत, आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केरजरीवाल यांना अभिनंदन करत भाजपवर हल्लाबोल्ल केला आहे.

शरद पवार राज ठाकरेंच्या बद्दलत्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “काही लोक राज ठाकरे यांचं भाषण ऐकायला येतात. तर काही राज ठाकरेंना पाहायला येतात. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भाषणाला गर्दी होते”, टीका राज ठाकरेंवर केली आहे. शरद पवारांच्या टीकेला राज ठाकरे काय प्रतित्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

भाजपच्या पराभवाची मालिका सुरू झाली

‘दिल्ली हे देशातील इतर शहरांपेक्षा वेगळे शहर आहे. तिथे अनेक राज्यांतील लोक आहेत. त्यामुळे दिल्लीच्या निवडणुकीचा निकाल हा त्या राज्यापुरता मर्यादित नाही. बदलाचे वातावरण देशभरात आहे. भाजपच्या पराभवाची मालिका सुरू झाली आहे आणि ती आता थांबणार नाही,’ अशी टीका पवारांनी केली आहे. पवार पुढे म्हणाले की, ‘भाजपचा धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न फसला असून भाजपच्या पराभवाची मालिका आता थांबणार नाही, असे म्हणत शरद पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. शरद पवार पुढे म्हणाले की, भाजपही देशाची आपत्ती असून जाणिवपूर्वक धार्मिक कटुता निर्माण करण्याचा प्रयत्न फसला.’

बांग्लादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मोर्चा

बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात राज ठाकरे यांनी रविवारी (९ फेब्रुवारी) मुंबईत मोर्चा काढला होता. या मोर्चात नाशिक, पुणे आणि राज्यभरातील मनसैनिक सहभागी झाले होते. मोर्चानंतर आझाद मैदान येथे राज ठाकरेंची सभा झाली होती. या सभेलाही प्रचंड गर्दी दिसली होती. मात्र, यावरुन शरद पवार यांनी मनसेवर निशाणा साधला .

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टीम इंडियाच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी विराट कोहली

News Desk

ज्योतिरादित्य शिंदेंना मिळालं ३० वर्षांपूर्वी वडिलांनी सांभाळलेलं खातं

News Desk

बिकानेर एक्सप्रेसचा भीषण अपघात; अनेक प्रवासी जखमी

News Desk