HW News Marathi
महाराष्ट्र

तुम्ही खरच एकटं लढणार आहात का?…तसं स्पष्टच सांगा, पवारांचा काँग्रेसला सवाल 

मुंबई | महाविकासआघाडी सरकारमधील एक प्रमुख पक्ष असलेल्या कॉंग्रेसकडून सध्या स्वबळाची घोषणा वारंवार केली जात आहे. त्यामुळे कुठेतरी ठाकरे सरकारमध्ये बिघाडी आहे असं दिसून येत आहे. एकीकडे असं असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावर केलेल्या टीकेमुळे आणखीनच तणावात वाढ झाल्याचं दिसून आलं. या बाबी सुरु असताना काल (१३ जुलै) कॉंह्रेसचे तीन महत्त्वाचे नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटले. तब्बल अर्धा तास या नेत्यांनी पवारांशी चर्चा केली. यावेळी शरद पवारांनी या नेत्यांना नेमका सवाल केला. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचीही भंबेरी उडाली. तुम्ही खरंच एकटं लढणार आहात का?, असा सवालच शरद पवारांनी केला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. पवारांनी काँग्रेस नेत्यांना थेट सवाल केल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

तुम्ही खरंच एकटं लढणार आहात का?

काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काल शरद पवारांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली होती. या चारही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याचं कळतं. या बैठकीत ओबीसींच्या आरक्षणावर चर्चा झाली. त्यानंतर राज्य सरकारचा कारभार आणि एकूण तीन पक्षातील वादावर चर्चा झाली. त्याचवेळी पवारांनी एक महत्त्वाचा प्रश्न या तिन्ही काँग्रेसच्या नेत्यांना केला. तुम्ही खरंच एकटं लढणार आहात का? तसं स्पष्ट सांगा. नाना पटोलेंना दिल्ली हायकमांडने काही अधिकार दिले आहेत का?, असा सवाल पवारांनी या तिन्ही नेत्यांना केला, असं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

शरद पवार असा प्रश्न विचारतील असं वाटत नाही

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार आहे. देशाचे काँग्रेसचे प्रभारी जेव्हा राज्यात येतात तेव्हा ते मित्र पक्षांच्या नेत्यांच्याही गाठीभेटी घेत असतात. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे ते त्यांना भेटले. या भेटीत ओबीसींच्या प्रश्नावर चर्चा झाली. त्यावेळी इतर विषयही निघाले असतील. ते स्वाभाविक आहे. पटोले आणि पवार साहेबांशी संबंधित विषयांवरही चर्चा झाली आहे, असं सांगतानाच युती, आघाडी करायचा निर्णय पक्ष नेतृत्व घेत असते. त्यामुळे पवार असा प्रश्न विचारतील असं वाटत नाही. आघाडीचा निर्णय हा नेहमीच अंतिम टप्प्यावर होत असतो. 2014मध्येही अंतिम टप्प्यावर निर्णय झाला होता. त्यावेळी आम्ही वेगळे लढलो होतो. त्याआधीही तसंच झालं होतं, असं काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“भाजप जनतेला धोका देत आहे” ​नवाब मलिक यांचा आरोप

News Desk

राष्ट्रवादी आमदाराच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा 

News Desk

राज्याभिषेक सोहळ्यासाठी मिळेल त्या वाहनाने रायगडाकडे कूच करा संभाजीराजेंचा आदेश

News Desk