HW News Marathi
महाराष्ट्र

जे आहे ते सांभाळता येत नसलेले स्मार्ट सिटी करायला निघालेत !

मुंबई | गेल्या चार दिवसांपासून मुंबईसह उपनगरात जनजीवन विस्कळीत झाली आहे. जोरदार पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी सचल्याने रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकल सेवा कोलमंडली. यानंतर विरोधकांनी पावसावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “तुंबलेली मुंबई महापौरांना दिसत नाही. जे आहे ते सांभाळता येत नसलेले स्मार्ट सिटी करायला निघालेत,” राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सुद्धा सरकारवर निशाणा साधला.

देशाची आर्थिक आज (२जुलै) पूर्णपणे ठप्प झाली आहे. मुंबई स्वच्छ झाल्याचा दावा करते.सरकारने खबरदारी न घेतल्यानं किड्या-मुंग्यांप्रमाणे माणसे मरतात. जे आहे ते सांभाळता येत नसलेले स्मार्ट सिटी करायला निघालेत! महापौरांना तुंबलेली मुंबई दिसत नाही. हा सत्तेचा माज आहे. सरकारचा बेजबाबदारपणा आहे, असे ट्वीट पवारांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवरून सरकारवर तोफ डागली.

शिवसेनेच्या हातात २० वर्षापेक्षा जास्त काळ मुंबईची सत्ता आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही मिठी नदीचे काम पूर्ण होत नाही. दरवर्षी महानगरपालिका मुंबई स्वच्छ झाल्याचा दावा करते. मात्र प्रत्यक्षात खबरदारी न घेतल्याने माणसं किड्या-मुंग्यांप्रमाणे मरत आहे. मुंबई तुंबली की तेव्हा सरकारला जाग येते असा आरोप पवार यांनी केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळासाठी निधी उपलब्ध; प्रस्ताव तात्काळ सादर करा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

News Desk

ज्ञानवापी मशिदी प्रकरणाची सुनावणी उद्या दुपारी 3 वाजता होणार – सर्वोच्च न्यायालय

Aprna

बाळासाहेब ठाकरेंनी जी सेना निर्माण केली ती आता ‘सोनिया सेना’ झाली!

News Desk