HW News Marathi
Covid-19

भाजपचा आमदार फुटला अन् एखाद्या मतदारसंघात पोटनिवडणुक लागली तर आश्चर्य वाटू नये !

पंढरपूर । भाजपचे सरकार येईल असं खोटं देवेंद्र फडणवीस वारंवार बोलत असतात. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांना त्रास नको म्हणून आम्ही गप्प आहोत. अन्यथा भाजपचा आमदार फुटला आणि आणखी एखाद्या मतदारसंघात पोटनिवडणुक लागली तर आश्चर्य वाटून घेऊ नये असा सूचक इशारा आज (१४ एप्रिल) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला दिला आहे. मंगळवेढा मतदारसंघ पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ गेल्या दोन दिवसापासून जयंत पाटील पंढरपूरात आहेत.

भगीरथ भालकेंना असलेला जनाधार पाहता इथल्या लोकांनी निवडणुकीपूर्वीच त्यांना आमदार ठरवले आहे हे स्पष्ट दिसून येते असेही जयंत पाटील म्हणाले. “पंढरपूर – मंगळवेढा या मतदारसंघासाठी भारत नानांनी बरेच कष्ट घेतले आहेत. म्हणूनच पंढरपूर मंगळवेढ्याच्या जनतेने भल्याभल्यांना बाजूला ठेवून तीन वेळा भारत नानांना निवडून दिले. आजही तीच परिस्थिती आहे, काहींनी धनदांडग्यांना उमेदवारी दिली असली तरी लोकांनी भगीरथ भालके यांना खंबीर पाठिंबा दिला आहे”,असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पंढरपूर – मंगळवेढ्याला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप भाजपनेच केले !

“देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर – मंगळवेढ्यासाठी मोदीसाहेबांकडून पैसे आणू असे सांगितले अहो पैसे कुणी मागितले? योजना पूर्ण करण्याची महाराष्ट्र सरकारमध्ये ताकद आहे असा विश्वास व्यक्त करतानाच पंढरपूर – मंगळवेढ्याच्या जनतेची इतकी काळजी होती तर मागच्या ५ वर्षात कामे का नाही केले? असा खोचक सवालही जयंत पाटील यांनी केला आहे. दरम्यान पंढरपूर – मंगळवेढ्याला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप भाजपनेच केले”, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्राच्या भरड धान्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रात मका व ज्वारी खरेदीचा निर्णय

News Desk

Unlock 3.0 | ३१ जुलैनंतर देशात ‘अनलॉक-३’ची प्रक्रिया सुरु होणार ?

News Desk

नाशिक ऑक्सिजन गळतीची दिल्लीत पुनरावृत्ती, २० रुग्णांचा झाला मृत्यू

News Desk