HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला, राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!

मुंबई | अहमदनगर महानगरपालिकेत स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार निवडून आला आहे. भाजपमधून काल (२४ सप्टेंबर) राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या मनोज कोतकर यांची स्थायीच्या सभापतीपदी वर्णी लागली आहे. निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानत पत्र पाठवले आहे.

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, मंत्री शंकरराव गडाख यांच्या चर्चेतून योग्य निर्णय झाला. चर्चेप्रमाणे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र बसून हा निर्णय घेतला आहे. अहमदनगरच्या राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी मिळून शब्द पाळला आहे.’ असे पत्र राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी लिहिले आहे.

‘अहमदनगर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, शशिकांत गाडे यांनीही सकारात्मक भूमिका घेतली. यापुढचे निर्णय उद्धव ठाकरे आणि अजित पवार एकत्र बसून घेणार आहेत. त्याला आमच्या आणि सेनेच्या कार्यकर्त्यांची मान्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला आणि त्यांचा निरोप मिलिंद नार्वेकर यांचं अजित पवारांशी बोलणं झाल्याप्रमाणे आम्हाला मिळाला’ असेही संग्राम जगताप यांनी लिहिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमदार बाळासाहेब मुरकुटेंचा महावितरण कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

News Desk

‘ईद-उल-अजहा’ तथा ‘बकरी ईद’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

News Desk

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जी-२० बैठकस्थळी प्रदर्शनाला भेट

Aprna