HW News Marathi
Covid-19

स्वार्थी राजकारणासाठी जोमात, सामाजिक प्रश्नावर कोमात ! ‘लोकल’च्या वादात रोहित पवारांची उडी 

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनलॉकची प्रक्रिया सुरु असताना राज्यातील धावतं शहर अशी ओळख असलेली मुंबई आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी मुंबई लोकल सुरु करण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्नशील आहे. याच पार्श्वभूमीवर, आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी याच मुद्द्यावरुन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यावर निशाणा साधला आहे. “राज्य सरकारने श्रमिक रेल्वेबाबत तपशील दिला नाही म्हणून मध्यरात्री ट्विट करण्याची तत्परता दाखवणारे रेल्वेमंत्री पियुष गोयल मुंबई लोकल सुरु करण्यासंदर्भात पाठवलेल्या पत्रावर ४ दिवस उलटून गेल्यावरही निर्णय देत नाहीत, याचं आश्चर्य वाटतं”, असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे.

मुंबई लोकल सेवा आता सर्वसामान्यांसाठीही सुरु करावी अशी मागणी राज्य सरकारने पत्राद्वारे केंद्रोय रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे. मात्र, केंद्राकडून याबाबत कोणतेही उत्तर आलेले नाही. याच पार्श्वभूमीवर, रोहित पवारांनी पियुष गोयल यांच्यावर निशाणा साधताना आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे कि, “स्वार्थी राजकारणासाठी सतत जोमात असणारे विरोधक अशा सामाजिक प्रश्नावर मात्र कोमात जातात. श्रमिक रेल्वेबाबत राज्य सरकारने तपशील दिला नाही, असं ट्विट मध्यरात्री करण्याची तत्परता दाखवणारे रेल्वेमंत्री लोकल सुरु करण्याच्या पत्रावर चार दिवस उलटले तरी निर्णय घेत नाहीत, याचं आश्चर्य वाटतं.”

राज्य सरकारचा प्रस्ताव काय ?

राज्य सरकारने दिलेल्या या प्रस्तावानुसार, सकाळी आणि संध्याकाळी मुंबईतील ऐन गर्दीच्या वेळी म्हणजेच सकाळी ८ वाजल्यापासून ते सकाळी १०.३० वाजेपर्यंत त्याचप्रमाणे संध्याकाळी ५ वाजल्यापासून ते संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत केवळ ओळखपत्र आणि क्यूआर कोड असलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची परवानगी दिली जाईल. तर ज्या वेळेत फार गर्दी नसेल अशा वेळेत म्हणजेच सकाळी पहिल्या लोकलपासून ते सकाळी ७.३० वाजेपर्यंत, सकाळी ११ वाजल्यापासून ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत त्याचप्रमाणे रात्री ८ वाजल्यापासून ते शेवटच्या लोकलपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१ मेपासून १८ वर्षांवरील सगळ्यांचे कोरोना लसीकरण होणार? राजेश टोपे म्हणतात…

News Desk

ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयाचे आशिष शेलार यांनी केले स्वागत

News Desk

देशात गेल्या २४ तासांत ११,९२९ सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद

News Desk