HW News Marathi
महाराष्ट्र

एकदा घरोबा केला की, सारखे सारखे असे कुंकू बदलायच नसते !

बीड | “गुदमरसारखे होते म्हणून तिकडच्या घरी गेलो तीन वेळा मंत्री होवून गुदमरत का ? असा सवाल उपस्थिती करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जयदत्त क्षीरसागर यांचा खरपूस समाचार घेतला आहे. पवार पुढे म्हणाले की, “घरोबा एकदाच करावा लागतो. सारखे सारखे असे कुंकू बदलायच नसते, त्यांच्या सोबतच प्रामाणिक रहायचे असते. घरोबा करुन जर प्रामाणिक पणा सोडला तर त्याला लोक काय म्हणातात मी सांगत नाही, असे म्हणत पवारांनी जयदत्त क्षीरसागरवर टीकास्त्र सोडले. तर बीडमध्ये आज (१६ ऑक्टोबर) सभेत जयदत्त क्षिरसागर यांच्यावर घाणाघाती हल्ला केला.

पवार पुढे बोलतांना म्हणाले की, जयदत्त क्षिरसागर यांना मंत्रीपद एक वेळा नाही, तर तीन वेळा दिले. ज्यामधून बीड जिल्ह्याचा विकास अपेक्षित होता. दिवंगत केशर काकूने हयातीत विचाराची साथ कधीच सोडली नाही. त्या प्रामाणिक राहिल्या त्यांचा आज सन्मान होतो. मात्र, त्यांची दुसरी पिढीला काकू पेक्षा जास्त मिळाले, तरी सत्ता, पदे दिले तरी सांगतात की, त्यांना गुदमरसारखे होते म्हणून तिकडच्या घरी गेलो तीन वेळा मंत्री होवून गुदमरत का ? असा सवालही पवारांनी यावेळी उपस्थिती करत क्षीरसागर यांच्यावर टीकास्त्र सोडले. सारखे सारखें कुंकू बदलायचे नसते.घरोबा एकदाच करावे लागत कुंकू बदल की, त्याला लोक काय म्हणातात तेे सांगत नाही.असे म्हणत पवारांनी जयदत्त क्षीरसागर यांचा खरपूस समाचार घेतला.

बीड शहरात संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री सुरेश नवले, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार उषा दराडे, माजी आमदार सय्यद सलीम, राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांची उपस्थिती होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भोसरी प्रकरणात एकनाथ खडसेंना दिलासा, २५ जानेवारीपर्यंत सुनावणी तहकूब

News Desk

ठाण्यात पेट्रोल पंप चालकाकडूनच पेट्रोलची चोरी

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी जयंत पाटील यांची वर्णी

swarit