HW News Marathi
महाराष्ट्र

“बाबासाहेबांच्या निधनाने महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला!” – शरद पवार

मुंबई | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज निधन झाले. बाबासाहेब यांचे आज (१५ नोव्हेंबर) पहाटे ५ वाजून ७ मिनिटानं त्यांनी अखेरचा श्वास घेतला. “बाबासाहेबांच्या निधनाने महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला”, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

शरद पवारांनी ट्वीटमध्ये म्हणालं, “महाराष्ट्राच्या नव्या पिढीला पूर्वजांचा इतिहास अत्यंत साध्या भाषेत सांगत इतिहासासंदर्भात जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेकडो व्याख्याने त्यांनी दिली. या विषयासंबंधी नव्या पिढीमध्ये आस्था निर्माण करण्यासाठी योगदान देणारे बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यामध्ये नाहीत.” शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला, अशा शब्दात त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्वीटमध्ये म्हटलं, “शब्दांमध्ये मांडता येणार नाही असं दु:ख मला झालं आहे. बाबासाहेब पुरंदरेच्या निधनामुळे इतिहास आणि संस्कृतिक क्षेत्रामध्ये कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झालीय. त्यांच्या प्रयत्नांमुळेच भविष्यातील पुढ्या छत्रपती शिवाजी महारांजांशी जोडलेल्या राहतील. त्यांनी केलेलं इतर कामही कायमच स्मरणात राहील,” असं म्हटलं आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुमचा भुजबळ करु म्हणणाऱ्यांना सांगायचं की…” छगन भुजबळांचा इशारा

News Desk

उदयनराजे भोसलेंचे भाजपत योगदान किती?, संजय काकडेंचा सवाल

swarit

“… साखर आयुक्तांनी आदेश मागं घ्यावा, अन्यथा संघर्ष अटळ”, राजू शेट्टींचा इशारा!

News Desk