HW News Marathi
महाराष्ट्र

बीडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, आमदार जयदत्त क्षीरसागर यांचा राजीनामा

मुंबई | राष्ट्रावादी काँग्रेसचे बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी राजीनामा दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवसापूर्वी क्षीरसागर यांनी विधानसभा अध्यक्षकांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. यावेळी क्षीरसागर यांच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई यांच्या विधानसभेत उपस्थित होते. क्षीरसागर यांच्या राजीनाम्याने बीडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जाते. क्षीरसागर आज (२२ मे) सायंकाळी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

‘वादळात दिव्याचे रक्षण केले, आता दिव्यानेत हात पोळले’ अशा शब्दात राष्ट्रवादीवर निशाणा साधतानाच ‘हेचि फळ काय मम तपाला’ असा काव्यात्मक सवालही क्षीरसागर यांनी उपस्थित केला.जयदत्त क्षीरसागर हे गेल्या काही दिवसांपासून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे बीडमधील नेते धनंजय मुंडे यांच्यावर नाराज होते.

तसेच राष्ट्रवादीत घुसमट होत होती, असे सांगत त्यांनी धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, प्रकाश सोळंके यांच्यावर टीकाही केली होती. याशिवाय, बीडमधील एका कार्यक्रमात जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले होते. असे असेल तरी त्यांनी भाजपमध्ये की शिवसेनेत प्रवेश करणार, याबाबत कोणताही खुलासा केला नव्हता. मात्र, त्यांनी शिवसेनेची वाट धरली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

या देशातील कोणतीही तपासयंत्रणा म्हणजे परमेश्वराचा अवतार नसतो!

News Desk

अन्नात विष कालवणे हे आमचे संस्कार नाहीत !

swarit

…अन् सोनू सूद पोहोचला शरद पवारांच्या भेटीला!

News Desk