HW News Marathi
Covid-19

धूळ’फेक’ न करता केंद्र व राज्य सरकारने मिळून अधिकाधिक कंपन्यांना प्रयत्न करावा !

मुंबई | कोरोनाविरोद्धच्या लढाईत देशाला आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (१२ मे) ० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. या आर्थिक पॅकेज भारताच्या जीडीपीच्या १० टक्के इतके आहे. मोदींच्या आर्थिक पॅकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत स्वागत केले आहे. “खऱ्या अर्थाने मेक इन इंडिया व मेक इन महाराष्ट्राची गरज आहे. पण त्यासाठी कोणतीही धूळ’फेक’ न करता केंद्र व राज्य सरकारने मिळून अधिकाधिक कंपन्यांना देशात व राज्यात आणण्याचा प्रयत्न करावा,” असे सल्लाही रोहित पवार ट्वीटच्या माध्यमातून केंद्राला दिला आहे.

रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मांडलेली स्वावलंबी भारताची संकल्पना व त्यासाठी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजचे स्वागत आहे. याबाबत अर्थमंत्री निरमला सीतारमण या लवकरच तपशील जाहीर करतील.पण खऱ्या अर्थाने ‘मेक इन इंडिया’साठी उचललेले हे पाऊल ठरावे,ही अपेक्षा.” असे म्हणाले. “संकटाचा सामना करण्यासाठी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. स्वावलंबी भारत असं या पॅकेजला नाव देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाचा सामना करण्यासाठी घोषित केलेले २० लाख कोटी रुपये हे आतापर्यंतचे सर्वात मोठे आर्थिक पॅकेज आहे,” असे दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धक्कादायक ! बुलढाण्यात संग्रामपूरमध्ये ४७ जणांची ‘क्वारंटाईन पंगत’

News Desk

कोल्हापूरात आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण!

News Desk

विश्वास नांगरे-पाटील, कृष्णप्रकाश यांच्यासह तब्बल ४५ जणांची बदली…

News Desk