HW News Marathi
देश / विदेश

भीमा-कोरेगाव, ‘एल्गार’ परिषदेचा संबंध नाही !

मुंबई | एल्गार परिषद आणि भीमा- कोरेगावा यांचा संबंध नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार यांनी आज (१८ फेब्रुवारी) मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. पवार पुढे म्हणाले की, एल्गार परिषदेशी संबंध नसलेल्या, हजर नसलेल्या लोकांवर खटले भरले गेले.

सुधीर ढवळे यांनी एल्गार परिषदेत उपेक्षितांवर कविता सादर केली. या कवितेतून लोकांच्या तीव्र भावना सुधीर ढवळेंनी मांडल्या होत्या. ढवळेंनी कवी नामदेव ढसाळ यांच्या गोलपीठा या काव्यसंग्राहीतील काही कविता सादर केली. ढवळेंनी सादर केलेल्या कवितेचा आधार घेऊन लोगकांना तुरुंगात डांबले गेले, असे पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार आहे. त्यातील एक कविता अत्याचाराविरुद्ध भावना व्यक्त करते. ‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, तुमची आय-बहीण आजही विटंबली जाते’ ही कविता वाचल्याने सुधीर ढवळेंवर कारवाई केली, असे शरद पवार म्हणाले.

दरम्यान, पवार म्हणाले की, कोरेगाव-भीमा हा वेगळा कार्यक्रम आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. स्तंभाला अभिवादन त्या ठिकाणी केले जाते. दरवर्षी लोक जमतात आणि विजय स्तंभाला अभिवादन करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तिथे जाऊन आल्यानंतर तिथे जाणाऱ्यांची संख्या वाढली. संभाजी भिडे यांनी त्या ठिकाणी एक वेगळे वातावरण निर्माण केले गेले. त्यात नक्की काय झाले ते चौकशीत बाहेर येईल, असा दावाही पवारांनी केला आहे.

 

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

 

  • मागच्या सरकाराने अधिकाराचा गैरवापर केला, असे म्हणत पवारांनी विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीसांवर टीका
  • सेक्शन १० चा वपार करून राज्य सरकारने चौकशी करावी
  • राज्य सरकारलाही समांतर चौकशी करण्याचा अधिकार
  • हे संपूर्ण प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले ते योग्य नाही
  • पुरावे असे तयार केले की त्यांना जामीन मिळाला नाही
  • पोलिसांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी पवारांनी केली
  • आमचा आक्षेप पोलिसांच्या वर्तनावर आहे
  • सुधीर ढवळे यांनी उपेक्षितांवर कविता सादर केली, या कवितेतून लोकांच्या तीव्र भावना कवितेतून मांडल्या होत्या
  • सुधीर ढवळेंनी कवी नामदेव ढसाळ यांच्या गोलपीठा या काव्यसंग्राहीत काही कविता सादर केली, कवितेचा आदार घेऊन लोगकांना तुरुंगात डाबणे अयोग्य
  • एल्गार परिषदेच्या वेळी हजर नसलेल्यांवर गुन्हे दाखल झाला
  • एल्गार परिषदेत १०० संघटनांनी सहभागी होत्या
  • भीमा-कोरेगावमध्ये संभाजी भिडे यांनी वेगळे वातावरण तयार केले
  • एल्गार परिषद, भीमा- कोरेगावा यांचा संबंध नाही,
  • गेली अनेक वर्षापासून भीमा-कोरेगावला अभिवादन करण्यासाठी लोक तेथे जमतात
  • भीमा-कोरेगावला जाणाऱ्याची संख्या वाढली
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पावसासाठी दोन पुरुषांचा एकमेकांशी विवाह

News Desk

‘भाजप चले जाव म्हणायची वेळ आली’, नाना पटोलेंचा केंद्रावर हल्ला

News Desk

दिवाळी बोनस न दिल्यामुळे एअर इंडियाचे कर्मचारी संपावर

News Desk