HW News Marathi
महाराष्ट्र

ST कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न चर्चेतून सोडविले जातील! – शरद पवार

मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न चर्चेतून सोडविले जातील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कर्मचाऱ्यांना दिला आहे. तसेच एसटी महामंडळ राज्य शासनात विलीनीकरणाचा मुद्दा हा न्याय प्रविष्ट असल्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही. एसटी बंद ठेवून प्रश्न सुटणार नाही. तर एसटी ही रस्त्यावर धावली पाहिजे, असे म्हणत एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचा आवाहन पवारांनी आज (१० जानेवारी) पत्रकार परिषदेतून केले आहे. शरद पवार आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज एस.टी कामगारांच्या एकूण २२ संघटनांच्या कृती समितीसोबत बैठक झाली, त्यावेळी शरद पवार बोलत होते. 

राज्य सरकारवर एसटी कर्मचाऱ्यांनी विश्वास ठेवा आणि कामावर परत या, तुमच्या सर्व मागण्या मान्य होतील, असे शरद पवार म्हणाले. “माझ्या दृष्टीने प्रवासी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. गेले दोन महिने संपामुळे प्रवाशांची जी स्थिती झाली, त्याबद्दलचे वर्णन न केलेले बरे. त्यातच कोरोनाचा नवा अवतार आल्यामुळे महाराष्ट्रावर आणखी एक संकट कोसळले आहे,” असेही पवार म्हणाले. 

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आमचे दायित्व परब म्हणाले, “एसटी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत तीन वेळा कामावर हजर होण्याची मुदत दिली होती. आणि कामावर रुजू झाल्यावर कारवाईवर फेरविचार करण्यात येणार आहे. तसेच आतापर्यं जे एसटी कर्मचारी कामावर आलेत त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. यापुढेही कामागारांवर कारवाई होणार नाही. आणि ज्या कर्मचाऱ्यांवर कावाई झाली त्यांच्याबद्दल अंतिम निर्णय लवकरच घेऊ. तसचे एसटी कर्मचाऱ्यांसाठी आमचे दायित्व आहे. त्याचप्रमाणे जनतेच्या प्रतीही आमचे दायित्व आहे, त्यामुळे आम्हाला तोही विचार करावा लागेल. तशी चर्चा कृती समितीबरबोर झाली आहे. जनतेला वेठीस धरून कुणालाही फायदा होणार नाही

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांची कर्जमुक्ती न झाल्यास राज्यात भूकंप – उद्धव ठाकरे

News Desk

२०२० पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम पूर्ण करू !

News Desk

उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ‘या’ कारणामुळे नाराज?

News Desk