HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीचा विराट सभांचा विक्रम, आता कोकणावर स्वारी

कोल्हापूरच्या आई अंबाबाईचं दर्शन घेवून पश्चिम महाराष्ट्राच्या हल्लाबोलची सुरुवात झाली. या आंदोलनाच्या सभांना जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.अजित पवारांचा षटकार,तटकरेंचा चौकार आणि मुंडेचा बॉम्ब असा काही सभांमध्ये कोसळत होता की, सुरुवातीपासूनच्या सभा विक्रमी झाल्या. सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणारे हे आंदोलन रात्री १०.३० ते ११ वाजेपर्यंत चालत असे. मात्र तरीही सभांमधील जनता सभा सोडून बाहेर पडत नव्हती इतका प्रतिसाद मिळत होता.

दिवसाला तीन सभा असे गणित असले तरी काही दोन-तीन दिवस चार सभा या आंदोलनामध्ये झाल्या परंतु प्रत्येक सभांना मिळणारा प्रतिसाद राष्ट्रवादीच्या नेत्यांचा जोष वाढवणारा ठरला. राष्ट्रवादीमधील सुरुवातीच्या फळीमधील नेत्यांची भाषणे झाली की अजित पवार , तटकरे, मुंडे यांचे भाषणातील फटकारे जनतेला वस्तूस्थितीची जाणीव करून देणारे होते.

मुंडेंच्या भाषणांना विषेश प्रतिसाद

सुनिल तटकरे, अजित पवार , धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे यांच्या भाषणांना जनता प्रतिसाद देतच होती परंतु या हल्ला बोल यात्रेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची मुलुखमैदान तोफ म्हणून ओळख असलेले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या भाषणांना शिटया आणि टाळयांचा कडकडाट पाहायला मिळत होता. तसाच प्रतिसाद पश्चिम महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये पाहायला मिळाला. धनंजय मुंडे यांचं आक्रमक आणि सरकारवर थेट वार करणारं भाषण एकप्रकारचे तुफानच आणत असल्याचे चित्रही यावेळी दिसत होते.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद सत्ताधाऱ्यांच्या काळजात धडकी भरवणारा ठरला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनतेच्या प्रश्नावर सुरु केलेले हे आंदोलन सर्वांनाच आपलेसे वाटू लागले असल्याचे चित्र आहेत्यामुळेच प्रत्येक सभांमध्ये जनता उत्स्फुर्तपणे सहभागी होताना दिसली.

कोकणातही घोंघावणार हल्लाबोलचे वादळ

विदर्भ, मराठवाडा, उत्तरमहाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र असा हल्लाबोल केल्यानंतर आता कोकणातही हल्लाबोलचे वादळ घोंघावणार आहे. पुढील महिन्यात हे हल्लाबोल आंदोलन होणार आहे. मात्र त्याअगोदर १० जूनला पक्षाच्या वर्धापन दिनी पुण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाची सांगता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्यांच्या होणाऱ्या सभा सरकारविरोधी लढण्यास आणखी प्रोत्साहन देत असल्याची भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा

News Desk

कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई जनतेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे !

News Desk

“…तर मी कोणत्याही भ्रष्टाचाराला हात लावणार नाही”, संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप

Aprna