HW News Marathi
महाराष्ट्र

मी परत येईन ऐवजी आता परत जायची वेळ आली, नीलम गोऱ्हे यांनी फडणवीसांना डिवचले

पुणे | औरंगाबादचं नामांतर करण्याच्या मुद्द्यावरुन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना व काँग्रेसवर टीका केली असून ही नाटक कंपनी असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या टीकेला विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील असंही त्या म्हणाल्या आहेत. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

सरकारवर टीका करणं हेच विरोधी पक्षाच्या नेत्यांचं काम आहे. जर त्यांनी टीका केली नाही तर ते नाटक कंपनीतीलच एक पात्र आहेत का अशी शंका वाटेल. प्रेक्षक म्हणून ते चांगली भूमिका निभावत आहेत. आमच्या भूमिकेवर शंका घेण्याची आवश्यकता नाही. त्यांना धक्का बसला आहे. मी परत येईन ऐवजी आता परत जायची वेळ आली आहे,” असं उत्तर निलम गोऱ्हे यांनी फडणवीसांच्या टीकेला दिला.

“औरंगाबादचे संभाजीनगर मुळात हा विषय वादाचा नाही. संभाजीनगरचा प्रस्ताव आधीच ठेवलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रमुखही आहेत. महाविकास आघाडीतील घटक, संभाजीनगरच्या स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल यामध्ये शंका नाही. पण काही लोक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुणेकरांनी विद्यापीठाचे नामांतर आनंदाने स्वीकारलं होतं. मी उपसभापती असल्याने पुण्याच्या नामांतराबाबत कोणतीही एक भूमिका घेऊ शकत नाही,” असं निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनंत गीते म्हणाले, ‘शरद पवार आमचे नेते होऊच शकत नाहीत’, आता संजय राऊत म्हणतात, ‘पवारसाहेब देशाचे नेते!’

News Desk

“हा विषय सरकारचा, मी काही बोलू शकत नाही”, मोफत लसीकरणावर राऊतांची प्रतिक्रिया

News Desk

‘मोदी सरकार हे आत्तापर्यंतचं देशातील सर्वात आडमुठं अन् अहंकारी’ – पृथ्वीराज चव्हाण

News Desk