HW News Marathi
Covid-19

राज्यात आज ५ हजार २१० नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई । राज्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीपासून पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने शासन-प्रशासन सतर्क झाले आहेत. राज्यात आज (२२ फेब्रुवारी) ५ हजार २१० नव्या कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच २४ तासांत नवे ५ हजार ३५ कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे, राज्यातील आजची नव्या कोरोनाबाधितांची संख्या ही जवळपास कोरोनामुक्त झालेल्यांइतकीच आहे. राज्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत एकूण १९ लाख ९९ हजार ९८३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.

राज्य सरकारने जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार,

राज्यात एकूण ५३ हजार ११३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४.९६% झाले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढू लागल्याने सरकारने कडक निर्बंधांचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे पुढील ८ ते १० दिवसांत परिस्थिती नियंत्रणात न आल्यास लॉकडाऊनचा विचार केला जाऊ शकतो असे संकेत मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. तसेच विरोधी पक्ष या पार्श्वभूमीवर सरकारवर गंभीर आरोप आणि शंका उपस्थित करत आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका लक्षात घेता आपले दौरे, सभा, कार्यक्रम रद्द केले आहेत. सद्यस्थितीत राज्यातील अनेक मंत्र्यांनी राज्यासमोर पुन्हा एकदा कोरोनास्थिती नियंत्रणात आणण्याचे आव्हान आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेने कोकणाला वाऱ्यावर सोडले आहे का? भाजपचा सवाल !

News Desk

देशात गेल्या २४ तासात भारतात ४५ हजार ८९२ नवे रुग्ण तर ८१७ रुग्णांनाचा मृत्यू

Jui Jadhav

देशात करोनामुळे एका दिवसात ५० डॉक्टरांचा मृत्यु ! दुसरीकडे देशात रूग्णसंख्येत पुन्हा घट

News Desk