HW News Marathi
महाराष्ट्र

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचंच नाव- एकनाथ शिंदे

नवी मुंबई | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं जाणार असल्याचं नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. भविष्यात दुसऱ्या मोठ्या प्रकल्पाला दि. बा. पाटलांचं नाव दिलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी संघर्ष समितीला दिल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, या विमानतळाच्या नामाकरणावरुन वाद सुरु झाला आहे. काल (१० जून) यासाठी नवी मुंबईत आंदोलनही केले गेले होते.

नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी वाढली आहे. पण राज्य सरकार देखील आपल्या भूमिकेवर ठाम दिसत आहे. नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. पण या निर्णयाला स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध आहे. काल (१० जून) ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी साखळी आंदोलन करण्यात आलं. भाजप, मनसे, रिपब्लिक पक्ष, वंचित बहुजन आघाडी यांनी देखील या मागणीला पाठिंबा दिला आहे. या मागणीसाठी सिडको भवनला घेराव घातला जाणार आहे. अशी माहिती देखील संघर्ष समितीने दिली होती. त्यामुळे आता संघर्ष समितीच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

प्रकल्पाग्रस्तांचे नेते दि.बा पाटील यांचं नाव द्या

सिडकोने नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविल्यामुळे प्रकल्पग्रस्त नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शिवसेनाप्रमुखांविषयी आदर आहे, त्यांचे नाव राज्यातील कोणत्याही महत्त्वाच्या प्रकल्पाला देता येईल, परंतु नवी मुंबईमधील विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी आग्रही भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली आहे. लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय संघर्ष समिती स्थापन करून आंदोलन सुरू केले आहे.

मानवी साखळी करत केले आंदोलन

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड चार जिल्ह्यांतील हजारो प्रकल्पग्रस्त या आंदोलनात सहभागी झाले होते. विमानतळाच्या जागेवर मानवी साखळीने दि. बा. पाटील यांचे नाव तयार करण्यात आले होते. प्रत्येक गावातील नागरिकांनी जबाबदारी वाटून किमान ८०० मीटरची साखळी तयार करण्याची जबाबदारी घेतली होती. या आंदोलनाची दखल घेऊन सरकारने योग्य निर्णय घेतला नाही तर लवकरच सिडको भवनला घेराव घालण्यात येणार आहे. याबाबत भावना तीव्र असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्जमाफीचा पहिला हफ्ता 18 ऑक्टोबरपासून

News Desk

दोन वर्षे विद्यार्थीनीचा विनयभंग करणारा अटकेत

News Desk

गोदावरीला पूर, जायकवाडीचा साठा 30 टक्क्यांवर

News Desk