HW News Marathi
Covid-19

ज्या दिवशी तुमचं उपमुख्यमंत्रीपद जाईल त्यादिवशी…!

मुंबई । राज्यातील कोरोनास्थिती अत्यंत बिकट आहे. आरोग्ययंत्रणेवर मोठा ताण आहे. त्यातच या काळात राज्यात दुर्घटनांचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे, राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजप सरकारला वेळोवेळी धारेवर धरत आहे.

याच पार्श्वभूमीवर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातही शाब्दिक चकमक झाली. “राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नॉट रिचेबल असतात” असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केल्यानंतर अजित पवारांनी “न्यूज चॅनलच्या पडद्यावर दिसण्यासाठी अभिनय करणाऱ्या, खोट्या प्रसिद्धीसाठी धडपडणाऱ्या नेत्यांपैकी मी नाही” असे म्हणत प्रत्युत्तर दिले. मात्र, आता या २ नेत्यांच्या वादामधून भाजपचे नेते नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी उडी घेतली आहे.

 

अजित पवारांवर निशाणा साधताना निलेश राणे म्हणाले की, “अजित पवार म्हणतात माझ्याकडे किती भाजपचे आमदार येतात ते पाहा. ते तुमच्याकडे नाही, तर उपमुख्यमंत्र्यांकडे येतात. ज्या दिवशी उपमुख्यमंत्रीपद जाईल त्यादिवशी आमदार सोडा नारळ पाणी विकणारा पण येणार नाही तुमच्याकडे. तुम्ही उपमुख्यमंत्री आहात विचार करून बोललं पाहिजे,” असा अत्यंत बोचरा टोला निलेश राणे यांनी अजित पवारांना लगावला आहे. अजित पवार किंवा राष्ट्रवादीकडून ह्याला काही प्रत्यत्तर येणार का ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज कोरोना २,४८७ नवीन रुग्णांची नोंद, कोरोनाच्या ३६ हजार ३१ रुग्णांवर उपचार सुरू

News Desk

 मुंबईतील झोपडपट्ट्यांना आर्किटेक्ट आणि विकासक जबादार, रतन टाटांची टीका

News Desk

इस्रायलच्या राज्यकर्त्यांनी थाळ्या वाजवण्याचे फालतू उपक्रम साजरे केले नाहीत, सेनेनं मोदी सरकारला सुनावलं

News Desk