HW News Marathi
महाराष्ट्र

“उदय सामंतांना माहितेय भाजपचं सरकार येणार म्हणून फडणवीसांकडे…”, निलेश राणेंनी पुन्हा फटकारलं

मुंबई | भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांच्या गुप्त भेटीवर एक ट्विट करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. निलेश राणे यांच्या ट्विटनंतर गुप्त बैठक नेमकी कशा संदर्भात झाली आणि उदय सामंत आणि फडणवीस यांच्यात काय खलबतं झाली, अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर या चर्चांना स्वत: शिवसेनेचे नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुर्णविराम लावला आहे. उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्त भूमिका मांडत निलेश राणे यांना उत्तर दिलं होतं. यावर आता पुन्हा निलेश राणे यांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले निलेश राणे?

“उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं की हो फडणवीस साहेबांची भेट घेतली होती. ते नाकारु शकत नव्हतेच आणि ते अडचणीत आल्याचंही मला माहित आहे. मुळात फडणवीस साहेबांना उदय सामंत यांना भेटायचं नव्हतं. ते स्वत:हून आले, फडणवीसांचा दौरा पाहिला आणि समोर येऊन उभे राहीले. कसेतरी २ भाऊ आत घुसले आणि समोर आल्यानं फडणवीस साहेबांना त्यांना भेटावं लागलं. उदय सामंत आधी म्हणाले मी दखल घेत नाही आणि लगेच २ तासांत पत्रकार परिषद घेत सारवासारव केली. आणि संस्कृतींची काय वार्ता करता तुम्ही? तुमची संस्कृती २०१९ च्या विधानसभा निवडणूकीवेळी मी बाहेर काढली होती. अख्या रत्नागिरीला माहित आहे. तुम्ही संस्कृतीची भाषा करु नका. तसेच, अनेक माजी मुख्यमंत्री रत्नागिरीत येतात पण तुम्ही त्यांना भेटायला जात नाही म्हणून राजकीय संस्कृती ही भाषा तुमच्या तोंडून शोभत नाही.

“दुसरी गोष्ट, हे सगळं जे घडलं ते त्यांना सांगणे भाग होतं कारण ते सत्य आहे. आणि बंगल्यावर ते अडणे आले आहेत. आपलं मंत्री पद वाचवण्यासाठी ती पत्रकार परिषद घेतली. कारण त्यांना माहित आहे बंगल्यावर या गोष्टी चालत नाही. आणि मी आरोपासाठी नाही तर खरा चेहरा दाखवण्यासाठी बोललो होतो. तुम्ही शिवसेनेच्या समोर, उद्धव ठाकरेंच्या समोर जे ढोंग करता ना तो तुमचा चेहरा मी आज फाड़ला. खरं तर मी दखल घेत नाही तुमची. कारण दखल घेण्यासारखं काम तुम्ही केलं नाही. कामं करा..कोरोना आहे, वादळ येऊन गेलं हे सगळं सोडून आपला धंदा टिकवून ठेवण्यासाठी आणि पुढची पेरणी करण्यासाठी कारण तुम्हाला माहित आहे उद्या भाजप येणार सत्तेवर यासाठी पेरणी करुन ठेवायची. म्हणजे उद्या काही झालं तर आपल्याला उडी मारायला बरं,” अशा परखड शब्दांत निलेश राणे यांनी उदय सामंत यांच्या पत्रकार परिषदेतील त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

 

काय म्हणाले होते उदय सामंत?

ज्यांना कोकणातील लोकांनी २ वेळा नाकारलं त्यांनीचं असं वक्तव्य करणं म्हणजे…

माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले, “माझी आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक झाली, हे कुणी सांगितलंय… ते माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. ज्या मंडळींना कोकणाने दोन-दोन वेळा नाकारलं. कोकणातील जनतेनं नाकारलं आहे. त्यांनी माझं राजकीय अस्तित्व अस्थिर करण्यासाठी गुप्त बैठक झाली. राजकीय खलबतं झाली, अशा प्रकारचं ट्विट करणं, हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये बसत नाही. भेट झाली. कुठे झाली. बंद खोलीत झाली, अशा प्रकारच्या बातम्या मी ऐकतो आहे. मी त्यांच्या आरोपांवर कधीही मी बोलत नाही, कारण जनतेचं त्यांची दखल घेतलेली नाही, तर माझ्यासारख्या मंत्र्यानं का घ्यावी?,” असा खोचक सवाल सामंत यांनी केला आहे.

गुप्त बैठक करायची असतीच तर माझ्या मतदारसंघात का केली असती?

“आता मुद्दा गुप्त बैठकीचा. गुप्त बैठक करायचीच होती, तर मतदारसंघात कशाला करू. रत्नागिरीच्या गेस्ट हाऊसवर दोनशे लोकांच्या समोर कशाला करू? गुप्त बैठक करायची असेल, तर नागपूर, मुंबई, चेन्नई हैदराबाद अशा शहरात जाऊन गुप्त बैठक करेल ना. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारची ट्विट करून उद्धव ठाकरे यांचा माझ्यावरचा विश्वास उडेल, अशा भ्रमात जर कुणी असेल, तर हा बालिशपणाच आहे. त्यामुळे त्यांच्यावर बोलणं मी टाळतो. घाबरतो असं नाही, पण कुणाबद्दल बोलावं,” असा टोला सामंत यांनी लगावला आहे.

काय म्हणाले निलेश राणे?

“तौक्ते चक्रीवादळाची गंभीर परिस्थिती सिंधुदुर्गात असतानाही उदय सामंत देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी खास रत्नागिरीत आले होते. त्या दोघांमध्ये बंद दरवाजाआड चर्चा झाली” असा गौप्यस्फोट निलेश राणे यांनी केला आहे. निलेश राणे यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

दरम्यान, निलेश राणे यांनी आणखी एक ट्विट केले होते. ज्यात त्यांनी उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दल लिहिले आहे. ‘देवेंद्र फडणवीसजी जेव्हा वादळाची पाहणी करायला कोकणात आले, रत्नागिरी गेस्टहाऊसवर उदय सामंत व त्यांचे बंधू त्यांना भेटायला तडफडत होते. दोघेही कसेतरी साहेबांच्या रूम पर्यंत पोचले व देवेंद्रजींची इच्छा नसतानाही त्यांना भेटले. प्रसार माध्यमं काय भलतच दाखवत आहेत, कृपया दुरुस्ती करावी, असं म्हटलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काही लोकं जाणीवपूर्वक महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अंतर पडावं यासाठी प्रश्न निर्माण करतायत!

News Desk

“शेतकऱ्यांना वीज बिल भरावंच लागेल”,उर्जामंत्री भडकले!

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

News Desk