HW News Marathi
महाराष्ट्र

युवा सेनेचा एक शेंबडा हे प्रकरण मराठी विरुद्ध अमराठी करण्याचा प्रयत्न करतोय – निलेश राणे

मुंबई | अन्वय नाईक प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला अटक केली आहे. या प्रकरणात ठाकरे कुंटुबियांकडून आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा आरोप भाजप नेते निलेश राणे यांनी केला आहे. याबाबत निलेश राणे यांनी टि्वट करून हा आरोप केला आहे.

“अन्वय नाईक यांच्याबद्दल माहिती काढत असताना त्यांनी एक प्रॉपर्टी ठाकरे कुटुंबाला विकली आहे. आजही प्रॉपर्टी कार्डवर त्याची नोंद आहे. युवा सेनेचा एक शेंबडा हे प्रकरण मराठी विरुद्ध अमराठी करायचा प्रयत्न करतोय, त्याला माहित नाही हे प्रकरण कधी ठाकरेंच्या अंगाशी येईल कळणार नाही”, असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

 

अर्णब गोस्वामी यांचं प्रकरण उच्‍च न्‍यायालयामध्‍ये असूनही वारंवार वेगवेगळया तुरुंगात हलवून त्‍यांचा शारीरिक छळ राज्‍य सरकार आणि पोलिसांनी चालवला आहे. राज्‍य सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी होत आहे, असं नारायण राणेंनी आज म्हटले आहे.गोस्‍वामी यांच्‍या जीविताला काही धोका निर्माण झाल्‍यास त्‍याची जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल, असं म्हणत नारायण राणे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दुसऱ्यांच्या मुलांचं बारसं करण्याची शिवसेनेला सवयच – राणे

News Desk

“२-३ महिने शेतकरी तिथे आंदोलन करतायत, त्यावेळी का नाही काही मत व्यक्त केलं, कुणी थांबवलेलं होतं?” उपमुख्यमंत्र्यांनी सेलिब्रेटिंना सुनावले

News Desk

भाजपसोबत युती नाहीच, नाशिकमध्ये मनसे स्वबळावरच लढणार!

News Desk