HW News Marathi
महाराष्ट्र

३०० कोटींचा मालक ५-६ कोटींसाठी आत्महत्या करतो? हे पटण्यासारंखं नाही – निलेश राणे

मुंबई | “मुंबईतील प्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांनी आत्महत्या का केली?, याचं सत्य नक्की बाहेर पडेल,” अशी प्रतिक्रिया भाजप नेते निलेश राणे यांनी दिली आहे. “तब्बल ३०० कोटींचा मालक ५ ते ६ कोटींसाठी आईबरोबर आत्महत्या करतो, हे मला पटत नाही, यात काही वेगळंही कारण असू शकतं आणि त्याची उत्तरं महाराष्ट्राला मिळायला हवीत,” असेही निलेश राणे म्हणाले आहेत.

“अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री या दोघांनीच का आत्महत्या केली हे पटत नव्हतं. म्हणून अलिबागमध्ये स्थानिकांकडून माहिती काढल्यानंतर असं कळलं की त्यांची परिस्थिती इतकी वाईट नव्हती. त्यांनी आत्महत्या केली त्याचं कारण पैसे होऊ शकत नाही, ती आत्महत्या नाही, असं अलिबागमधील काही लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे सत्य बाहेर पडेलंच,” असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे. यावरुन त्यांनी महाविकासआघाडीच्या तपासावर संशय व्यक्त केला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रकांत पाटलांच्या नावाने वनविभागाची पुण्यातील 18 एकर जमीन बळकावण्याचा प्रयत्न!

News Desk

जाणून घ्या…राज्यात कोणत्या समाजाला किती टक्के आरक्षण

News Desk

डिसले गुरुजी पुन्हा चमकले… जागतिक स्तरावर आणखी एक सन्मानाचे पद प्राप्त

News Desk