HW News Marathi
महाराष्ट्र

निरुपम यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई | मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज (१७ सप्टेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आले आहे. निरुपम यांना काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदावरुन हटविण्याची मागणी काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांच्या गटासह दिवंगत नेते गुरुदास कामत यांच्या समर्थकांनी ज्येष्ठ नेत्यांनी राज्य काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जु खरगे यांची भेट घेऊन केली आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर दबाव टाकण्यासाठी निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याचे म्हटले जाते. “मी राहुल गांधी यांच्याशी एकनिष्ठ आहे. राहुल गांधी यांनी माझ्या काँग्रेस अध्यक्षपदी निवड आहे. मुंबईकरांच्या विविध प्रश्नांना लढा देण्यासाठी त्यांनी मला नियुक्त केले आहे. राहुल गांधी यांच्या आदेश येईपर्यंत मी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहीन, असे संजय निरुपम यांनी म्हटेल.”

मिलिंद देवरा हे काँग्रसेमधील सर्व गटांना एकत्र बांधून ठेवतील, असा विश्वास व्यक्त करत निरुपम यांच्या ऐवजी देवरा यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी मागणी या नेत्यांकडून करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आंबेडकर आणि फुले जयंती एक दिवा ज्ञानाचा लावून, घरी राहून साजरा दिवस करूया !

News Desk

प्रकल्पांना तात्काळ मंजुरी देईन…

swarit

केंद्रात तुमचं काही चालत नाही की तिथं बोलायला घाबरता? – रोहित पवार

News Desk
राजकारण

‘आई-वडील हे साक्षात परमेश्वर तर प्रत्येक स्त्री ही साक्षात लक्ष्मी आहे’ | राम कदम

News Desk

मुंबई | “मी यापूर्वीही महिलांची माफी मागितली आहे. आता पुन्हा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून माता – भगिनींची बिनशर्त माफी मागतो. तसेच मी आयोगाला विश्वास देऊ इच्छितो की आई-वडील हे साक्षात परमेश्वर आहेत आणि प्रत्येक स्त्री ही साक्षात लक्ष्मी आहे, हा संदेश रुजविण्यासाठी मी भविष्यात कायम प्रयत्न करीत राहीन,” असे राम कदम यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे माफी मागत म्हटले आहे.

दरम्यान, भाजप आमदार राम कदम यांच्या या माफीनाम्यावर कायदेशीर सल्ला घेऊन त्यानंतरच योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती विजया रहाटकर यांनी स्पष्ट केले आहे. दहीहंडी उत्सवात स्त्रियांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल भाजप आमदार राम कदम यांनी आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे माफी मागितली आहे. त्याचप्रमाणे या पुढे देखील महिलांचा सन्मान वाढेल यासाठी ते कायम कार्यरत राहतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला आहे.

राम कदम यांच्या वादग्रस्त विधानानंतर आयोगाने त्यांना 5 सप्टेंबर रोजी आपले म्हणणे आठ दिवसांत सादर करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार राम कदम यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे लेखी खुलासा सादर करून महिलांची माफी मागितली आहे. महिलांविषयक कोणतेही वक्तव्य करताना आमदार कदम यांनी काळजी घ्यायला हवी होती, असे आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी म्हटले आहे.

Related posts

मुख्यमंत्री शिवसेनेचाच, राष्ट्रीय राजकारणावरही भगव्याचाच वरचष्मा असेल !

News Desk

#LokSabhaElections2019 : मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अचानक जानकरांचा सूर बदलला !

News Desk

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने केली दिलगिरी व्यक्त

News Desk