HW News Marathi
महाराष्ट्र

“ये है उद्धव का ‘नया’ महाराष्ट्र” !!, नितेश राणेंची सरकारवर टीका

मुंबई | महाराष्ट्रात निर्बंध शिथिल झाले असले तरी देखील देऊळं अजूनही बंद आहेत. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विरोधकांच्या टीकेला समोरं जावं लागत आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

काय आहे ट्विट?

नितेश राणे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “‘महाराष्ट्रात मंदिर बंदच राहणार!! कारण हिंदू धर्माला आव्हान देणारं सरकार महाराष्ट्रात आहे. हिंदू हो, तो डर के रहो… ये है उद्धव का नया महाराष्ट्र!!, असं ट्वीट नीतेश राणे यांनी केलं आहे. नितेश राणे हे नेहमीच ठाकरे सरकारवर निशाणा साधून असतात. राज्यसरकारने देऊळं बंद ठेऊन बार सुरु ठेवले आहेत, यावरून राजकीय वातावरणात त्यांच्यावर चांगलीच टीका होत आहे.

आमच्यासाठी सगळीकडे देव

सरकारने निर्बंध शिथिल केले आणि वीरोशी पक्षाने त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. सरकारने देऊळं बंद ठेवली आहेत मात्र दारूची दुकानं सुरु असल्याने विरोधी पक्ष आता आघाडी सरकारवर टीका करत आहेत. आमच्यासाठी सगळीकडे देव आहे. मात्र, अनेक गरीब लोकांची उपजीविका मंदिरांवर अवलंबून आहे. हारवाल्यापासून ते पुजारी अशा अनेकांची उपजीविका ही मंदिरांवर अवलंबून असते. त्यांच्यासाठी तरी मंदिरं उघडा. मंदिरं बंद ठेवणे ही सरकारची चूक आहे. तुम्ही दारुची दुकानं सुरु ठेवता आणि मंदिरं बंद ठेवता, अशा शब्दात फडणवीस यांनी संताप व्यक्त केलाय. शेकापचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आणि सुधारकरपंत परिचारक यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त देवेंद्र फडणवीस पंढरपुरात आले होते. गणपतराव देशमुख यांचं विधिमंडळात उचित स्मारक करण्याची मागणी करणार असल्याचंही यावेळी फडणवीस म्हणाले. शाळा सुरु करण्याच्या निर्णयाबाबत सरकार धरसोड करत आहे. पालकांना आणि विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

लसीकरण झालेल्यांना मंदिरात परवानगी द्या

मुंबईमध्ये लोकल प्रवास सुरु झाला असून ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना लोकल मधून प्रवासाची परवानगी आहे. ज्या शहरांत किंवा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दर कमी आहे तिथे राज्य शासनाने निर्बंधांमध्ये शिथीलता दिली आहे. त्यानुसार आता हॉटेल, स्पा, जीम, सलून सगळं काही नियम आणि अटींनुसार सुरु करण्याला परवानगी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत सगळं खुल केलं मग मंदिर का बंद?, असा सवाल करत लसीकरण झालेल्या भाविकांसाठी मंदिरं खुली करा, अशी मागणीही तुषार भोसले यांनी राज्य शासनाकडे केली आहे. मंदिर उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो. मात्र, आता सगळं काही सुरु झालेलं असताना, शासनाने नियमांमध्ये शिथीलता दिलेली असताना मंदिरं उघडण्याचा निर्णय देतील सरकारने घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

भाजप कडून आंदोलनाचा इशारा

भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या औरंगाबादेतील घृष्णेश्वर मंदिरासमोर भाजपची अध्यात्मिक आघाडी आंदोलन करणार आहे. तुषार भोसले यांच्या उपस्थितीत हे आंदोलन होणार आहे. सध्या श्रावण महिना सुरु असल्यामुळे भाविकांसाठी श्रावणातील सोमवार हा महत्वाचा दिवस असतो. त्यामुळे श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी हे आंदोलन केलं जाणार असल्याची घोषणा तुषार भोसले यांनी केली आहे. यापूर्वी तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरासमोर भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन केलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मद्यविक्रीमुळे राज्याच्या तिजोरीत भर घालण्यात पुण्याचा मोठा हातभार

News Desk

ज्येष्ठ नाटककार जयंत पवारांचं निधन!

News Desk

अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी सायकलवरून वाटले सातबारा

News Desk