HW News Marathi
महाराष्ट्र

नितेश राणेंना न्यायालायचा दिलासा; शुक्रवारी होणार सुनावणी

मुंबई | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी शिवसैनिक संतोष परब हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु, न्यायालयाने सुनावणीदरम्यान नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर नितेश राणेंनी सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या अर्जावर आज (४ जानेवारी) सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने राणेंना दिलासा देत ७ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. म्हणजेच पुढील सुनावणी आता शुक्रवारी, ७ जानेवारीला दुपारी २.३० वाजता होईल.

नितेश राणेंवर आरोप झाल्यापासून ते अज्ञातवासात आहेत. याआधी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणेंची अटकपूर्व जामिनाची याचिका फेटाळून लावल्याने त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी झाली. यावेळी राणेंचे वकील नितीन प्रधान यांनी युक्तिवाद केला. तर सरकारी वकिलांनी देखील नितेश राणे हेच संतोष परब हल्ल्या मागील मुख्य सूत्रधार असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करू नये, असं न्यायालयाला सांगितलं. दरम्यान, सरकारी वकिलांनी प्रतिज्ञापत्रं सादर करण्यासाठी न्यायालयाकडे दोन दिवसांचा कालावधी मागून घेतला आहे. तसेच प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल होईपर्यंत नितेश राणेंना अटक करण्यात येणार नसल्याची ग्वाहीही राज्य सरकारने न्यायालयाला दिली. मात्र, आता अटकेपासून तात्पुरता दिलासा मिळाल्याने ते अज्ञातवासातून बाहेर येणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील एका मंत्र्याची आज विकेट पडणार ! चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा

News Desk

असा आहे…राज्याचा संपूर्ण अर्थसंकल्प; जनतेला नेमके काय मिळाले?

Aprna

मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष पदासाठी नेते पोहोचले थेट दिल्लीत

News Desk