HW News Marathi
महाराष्ट्र

कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १०० कोटी मंजूर झाल्याची नितीन गडकरींची माहिती!

पुणे। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाचा हाहाकार माजला होता. आणि यामुळेच अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली, तर काहींना आपला जीवदेखील गमवावा लागला. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूर आणि दरडी कोसळल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. तसेच पुरपरिस्थितीमुळे रस्त्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. कोकणात रस्ते खचले आहेत. तर नदीवरुन काही पूल देखील कोसळ्याच्या घटना घडल्या आहेत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील वाहून गेलेल्या अथवा खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम त्वरित सुरु करण्यात आले आहे. यासाठी केद्र सरकारकडून १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

तात्पुरत्या डागडुजीसाठी आणि ४८ कोटी रुपये

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे, वाहून गेलेल्या अथवा खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम त्वरित सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. या कामासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, माहीती गडकरींनी ट्वीट करुन दिली. यात ५२ कोटी रुपये तात्पुरत्या डागडुजीसाठी आणि ४८ कोटी रुपये कायमच्या दुरुस्त्या आणि बांधणीसाठी मंजूर करण्यात आले आहेत.

कायमची दुरुस्ती करण्याचेही काम प्राधान्याने

मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण जवळचा वशिष्ठी नदीवरचा पूल देखील पावसामुळे खराब झाला होता, त्याची दुरुस्ती लगेच करुन ७२ तासात तो पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असेही गडकरी यांनी सांगितले. तसेच, परशुराम घाट, कारूळ घाट, आंबा घाट, इथे रस्त्यात आलेले अडथळे देखील दूर करण्यात आले आहेत. तात्पुरत्या दुरुस्तीची कामे आधीच हातात घेण्यात आली असून, कायमची दुरुस्ती करण्याचेही काम प्राधान्याने करण्यात येणार आहेत असेही गडकरी यांनी म्हटले आहे

१ हजार ८०० कोटी रूपयांचे नुकसान

राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूर परिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे १ हजार ८०० कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे.राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूर परिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे १ हजार ८०० कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केला होता. प्राथमिक अंदाजानुसार २९० रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते, ४६९ रस्त्यांवरील वाहतूक खंडित झाली होती तर १४० पूल व मोऱ्या पाण्याखाली गेले होते. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही दिली असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मुंबई पोलीस’ आपला ब्रँड बाजारात आणण्याच्या तयारीत, जाणून घ्या काय काय वस्तू असणार

Aprna

नाना पटोलेंचाही फोन टॅप, बाळासाहेब थोरात यांचा गंभीर आरोप

News Desk

शिरुर परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – अजित पवार

News Desk