HW News Marathi
महाराष्ट्र

नितीन राऊत यांचे उर्जामंत्रीपद जाणार? कॉंग्रेसमध्ये मोठा फेरबदल होण्याच्या चर्चा

मुंबई | सचिन वाझे प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक बदल झाले. काही फेरबदल फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार काँग्रेसमध्येही अंतर्गत बदल केले जाणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मंत्रिपदासाठी वर्णी लागण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे ऊर्जामंत्री पद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज (१८ मार्च) दिल्लीत काँग्रेस नेत्यांची‌ हायकमांडसोबत बैठक होत आहे. या बैठकीत याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारमध्ये राजकीय भूकंपाची मालिका सुरुच आहे. संजय राठोड यांचा राजीनामा, मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी झाल्यानंतर अजून एक मोठी घडामोड घडण्याची दाट शक्यता आहे. कारण ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं मंत्रिपद धोक्यात असल्याची माहिती मिळत आहे. नितीन राऊत यांच्याकडील ऊर्जा खात्याची जबाबदारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लीज आज काँग्रेस नेत्यांची हायकमांडकडे बैठक होणार आहे.

विद्यमान ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं महत्त्व कमी न करता खातेबदल होण्याचे संकेत पूर्वीपासूनच मिळत आहेत. फेब्रुवारीच्या सुरुवातीला नाना पटोले आणि नितीन राऊत एकाच वेळी काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांच्या भेटीला गेले होते. राजधानी दिल्लीत झालेल्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.

काँग्रेसमध्येही अंतर्गत बदल

तर काँग्रेसमध्ये सुद्धा अंतर्गत बदल केले जाणार आहे. वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून नितीन राऊत यांना टीकेचा सामना करावा लागला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनात नितीन राऊत यांना विधानसभा अध्यक्षपदासाठी विचारले गेले होते पण त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसकडे असलेल्या काही खात्यांमध्ये बदल केली जाण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘लोकल प्रवासासाठी आजही रेड सिग्नल’, उद्धव ठाकरेंनी दिली माहिती

News Desk

राज्यपालांनी फोन करून भेटायला बोलावले, कशासाठी ते अद्याप माहिती नाही !

News Desk

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांच्या बलिदानाचा मुख्यमंत्र्यांना विसर; नितेश राणेंचं पत्र

Manasi Devkar