HW News Marathi
Covid-19

आनंदाची बातमी ! आता प्रवासासाठी ई-पासची गरज नाही

मुंबई | राज्यात कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येताना दिसत आहे. त्यामुळे आता मराहाष्ट्र अनलॉकच्या दिशेने पावलं टाकत आहे. राज्यात ७ जूनपासून अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. ५ टप्प्यांत हा अनलॉक असणार आहे. दरम्यान, आता तुम्हाला जर गावी जायचं असेल तर ई-पास शिवाय जाणं सहज शक्य होणार आहे. कारण अनलॉकच्या नव्या नियमावलीनुसार फक्त पाचव्या गटातील भागात ई- पास बंधनकारक असेल. शिवाय, प्रवास करताना पाचव्या गटातील कुठल्याही भागात तुम्ही जर थांबणार असाल तर मात्र तुम्हाला ई-पासची गरज लागणार आहे. त्यामुळे आता कोणालाही आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची गरज भासणार नाही.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राज्य शासनानं पुन्हा एकदा काही कठोर पावलं उचण्यास सुरुवात केली होती. ज्याअंतर्गत राज्यात ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत असणारे निर्बंध आणखी कठोर करण्यात आले होते. यासोबतच प्रवासावरील निर्बंधही अधिक कडक करण्यात आले होते. राज्यात पुन्हा एकदा ई- पासची तरतूद करण्यात आली होती. अत्यावश्यक कारणांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी सर्वसामान्यांना या ई पासची काढणे बंधनकारक होते. मात्र, यातुन आता लोकांची सुटका झाली आहे.

कोणत्या टप्प्यात काय सूरु होणार?

पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांत काय सुरू होणार?

– रेस्टॉरंट, मॉल्स

– गार्डन, वॉकिंग, ट्रेक सुरू होतील

– खाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील

-चित्रपट शूटिंगला परवानगी

-थिएटर सुरू होणार

-सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळ्याला 100 टक्के सुट

-ई कॉमर्स सुरू राहिल

-जिम, सलून सुरू राहणार

-जमावबंदी राहणार नाही

-बस 100 टक्के क्षमतेने

-आंतरजिल्हा प्रवास मुभा

-इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध लागू असणार ते जाहीर केले जातील

दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांत काय सुरू होणार?

-50 टक्के क्षमतेने रेस्टॉरंट सुरू

-सार्वजनिक जागा, मैदाने, वॉकिंग ट्रॅक पूर्ण सुरू राहतील

– लोकल ट्रेन अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी करू शकतात प्रवास

-बांधकाम पूर्ण सुरू, कृषी कामे सुरू

-ई सेवा पूर्ण

-जिम, सलून, स्पा, वेलनेस सेंटर 50 टक्के सुरू

-बसेस बैठक क्षमता पूर्ण क्षमतेने

-जिल्ह्याच्या बाहेर प्रायव्हेट कार, बसेस, ट्रेन, खाजगी गाड्या,टॅक्सी यांना परवानगी आहे मात्र पाचव्या लेव्हलला जाण्यासाठी ई पास लागेल

– लग्न समारंभ 100 जणांना परवानगी किंवा आसन क्षमतेच्या निम्मे

– सार्वजनिक वाहतूक 100 टक्के

– जमावबंदी असणार

– अंत्यविधी आणि बैठका बंधन नसणार

तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांत काय सुरू होणार?

– अत्यावश्यक आणि इतर दुकाने 7 ते 4वाजेपर्यंत सुरु राहणार(सोमवार ते शुक्रवार )

– अत्यावश्यक दुकाने शनिवार रविवार सुरू राहणार इतर दुकाने बंद राहणार

चौथ्या टप्प्यातील जिल्ह्यांत काय सुरू आहे होणार?

– अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 4 वाजेपर्यंत सुरु राहणार

– अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानं बंद राहणार

पाचव्या टप्प्यातील जिल्ह्यांत काय सुरू होणार?

– अत्यावश्यक सेवेतील दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील.

– शनिवार-रविवार मेडिकल वगळता सर्व दुकानं बंद राहतील.

याचसोबत तिसरा, चौथा आणि पाचव्या स्तरात इतर निर्बंधही कायम राहणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता ३१ डिसेंबर घरीच साजरा करा! – शंभूराज देसाई

Aprna

घरातून बाहेर पडताना ओळखपत्र सोबत ठेवा – पोलिसांच्या नागरिकांना सूचना

News Desk

देशात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ९८५१ नवे रुग्ण, तर २७३ जणांचा मृत्यू

News Desk