HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकारच्या पूर्ण मंत्रिमंडळ मध्ये एकाही मंत्र्यंत ओबीसी च्या मुद्यावर राजीनामा देण्याची हिम्मत नाही…..प्रीतम मुंडे

बीड| चक्का जाम आंदोलनाला संबोधित करतांना प्रीतम मुंडे म्हणल्या की,ओबीसी च्या मुद्यावर राज्य सरकारने तात्काळ सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येतील असे त्या म्हणाल्या

त्या पुढे बोलतांना म्हणल्या की,या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात असा एकही नेता नाही जो ओबीसी च्या राजकीय आरक्षण मिळण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकत नाही, त्यांच्यात एवढी हिम्मत नाही ! ती फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केले आणि यानंतर ही हिम्मत मुंडे साहेबत होती असे प्रीतम मुंडे यांनी महाविकास आघाडीत असलेल्या ओबीसी च्या नेत्यांना नाव न घेता टोला लगावला.

त्या पुढे बोलतांना म्हणाल्या की पंकजा ताईने हा लढा उचललेला आहे आणि या लढ्यात पंकजताईना नक्कीच यश मिळणार असल्याचे आश्वासन ही आंदोलन कर्त्यांना प्रीतम मुंडे यांनी दिले.हे आंदोलन बीड जिल्ह्याच्या परळी येथील इटके कॉर्नर येथिल चक्का जाम आंदोलनात बोलतांना म्हणल्या.

यावेळी प्रीतम मुंडे सह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले व आंदोलन थांबवण्यात आले.परळी येथीलइटके कॉर्नर परिसरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले असून सकाळी 10 पासून सुरू झले असून 12:45 वाजेपर्यंत हे आंदोलन करण्यात आले मात्र या आंदोलनामुळे कोसोदूर दु चाकी चार चाकी गाड्यांची रांगच रंग लागली असून यामुळे ट्राफिक जाम झाल्याचे चित्र पाहवयास मिळाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाळासाहेब थोरातांनी घेतली पवारांची भेट, राजकीय चर्चांना वेग

News Desk

“जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही”, शरद पवारांची स्पष्ट भूमिका

Aprna

बांधकामावर राबणाऱ्या जीवांचे काहीच मोल नाही का?

News Desk