HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात शरद पवारांवर टीका केल्याशिवाय कोणी मोठा होत नाही !

मुंबई । आगामी विधानसभा निवडणुका आता अवघ्या काहीच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना आता राज्यातील राजकारण तापू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आता एकमेकांवर टीका, आरोप करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना इशारा दिला आहे.

चंद्रकांत पाटील हे लोकसभा निवडणुकांपासूनच वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस तसेच विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांवर टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी चंद्रकांत पाटील यांना इशारा दिला आहे. “महाराष्ट्रात शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय कोणीच मोठा होत नाही”, असा टोला देखील धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.

“एकीकडे विरोधी पक्षाचे बडे नेते आपल्या संपर्कात असल्याचा दावा चंद्रकांत पाटील करत आहेतत. परंतु, त्यांच्या पक्षातील कोणते नेते आमच्या संपर्कात आहेत ते आम्हालाच माहीत आहे” असे सूचक विधान केले आहे. तर “गेल्या ५ वर्षांत एकाही मतदारसंघात आपल्याला उमेदवार मिळत नाही हे मान्य करा. त्यामुळे आता शरद पवारांवर टीका करण्याचा बालिशपणा चंद्रकात पाटलांनी करू नये”, असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सत्तेच्या हव्यासापोटी आंधळ्या भाजपाकडून पुन्हा मंदिराचे राजकारण !सचिन सावंत

News Desk

राज्यात ३०० मेळाव्यांमधून ५ लाख रोजगार उपलब्ध करून देणार!- मंगलप्रभात लोढा

Aprna

शरद पवार हे प्रेम करावं असं नेतृत्व आहेच, राऊतांचा राज्यपालांना टोला

News Desk