HW News Marathi
महाराष्ट्र

प्रवासी रेल्वेच्या बाबतीत रेल्वेने कोणताही प्रोटोकॉल काढला नाही

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात लॉकडाऊन आहे. त्यामूळे रेल्वे सेवाही बंद आहे. त्यामूळे लॉकडाऊन संपेपर्यंत प्रवासी रेल्वे न चालवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे आणि तशी माहितीही त्यांनी दिली होती. मात्र, तरीही १५ एप्रिलनंतर रेल्वे सुरु होणार असे लोकांना वाटत असल्याकारणाने लोकांचा हा समजही त्यांनी दुर केला आहे. रेल्वे मंत्रालयाकडून लॉकडाउन नंतर रेल्वे प्रवासाबाबत कोणताही प्रोटोकॉल जारी करण्यात आला नाही. यासंदर्भात काही निर्णय झाल्यास संबंधित विभागांना त्याबद्दल माहिती देण्यात येईल, असे त्यांनी ट्विट केले आहे.

तसेच, प्रवासी रेल्वे जरी बंद असली तरी फक्त मालगाड्या सुरु असल्याची माहितीही रेल्वे मंत्रालयाने या आधी दिली होती. जोपर्यंत सरकारकडून कोणताही आदेश येणार नाही तोपर्यंत प्रवासी रेल्वे बंदच असणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेवगाव तालुक्यात उस आंदोलन पेटले video

News Desk

मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांचा विश्वासघातः खा. अशोक चव्हाण

News Desk

सरकारचा आणि हिंदू धर्माचा काही संबंध शिल्लक राहिला नाही – निलेश राणे

News Desk