HW News Marathi
महाराष्ट्र

विठ्ठलाची पूजा करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही | मुख्यमंत्री

मुंबई | मराठा क्रांती मोर्चातील कार्यकर्त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपुरातील विठ्ठलाची पूजा करुन देणार नाही असा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुजेला जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. वारक-यांची सुरक्षा लक्षात घेता कोणाताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपण आपल्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर पूजा करणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.

तसेच 12 लाख वारक-यांच्या सुरक्षेला प्राधन्य देऊन मी उद्या पुजेला जाणार नाही. महाराष्ट्रातील विठ्ठलाचा सेवक म्हणून पांडुरंगाच्या महापूजेचा पहिला मान राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असतो. यंदा काही संघटनांनी मी पूजेला जाऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. परंतु मला विठ्ठलाची पूजा करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

मराठा समाजाचा आरक्षणासंदर्भात माझी भूमिका आंदोलकांच्या हिताचीच आहे. मराठा आरक्षणाचा मुद्द्दा आता उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. सरकार त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचेही फडणवीसांनी यावेळी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“मोदींच्या पक्षाला आज एनडीएची गरज नाही, पण विरोधकांना यूपीएची गरज आहे!” – सामना

News Desk

अशोक चव्हाणांना ‘त्या’ पदावरून हटवा !, विनायक मेटे आक्रमक

News Desk

थेट सरपंचपदांसह ११६६ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला मतदान

Aprna
राजकारण

या नेत्यांना पंढरपुरची महापूजा करता आली नाही

swarit

मुंबई | महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील विठ्ठलाच्या शासकीय पुजा ही राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते होते. महाराष्ट्राची परंपरा आहे. परंतु यंदा ही पूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होऊ देणार नाही, असा इशारा मराठा समाजाच्या आंदोलकांनी दिला आहे. सध्या महाराष्ट्रातील परळी येथे मराठा बांधव गेले ५ दिवस ठिय्या आंदोलन करत आहेत.

मराठा समाजाने आपल्या मागण्यांसाठी कायदेशीर मार्गाने ५८ मूक मोर्चे काढूनही सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांना प्रतिसाद दिला नाही. तब्बल २ वर्षे संयमाने लोक चळवळ चालवूनही सरकारने दखल घेतली नाही. म्हणून मराठा समाजाने आता ठोक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. आणि पुन्हा एकदा राज्यात ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली.

तसेच आषाढी यात्रा काळात आंदोलनाची ही पहिलीच वेळ नाही. या आधी देखील आंदोलकांनी राज्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी आषाढी यात्रेच्या काळात आंदोलन केली आहेत. या आंदोलनांमुळे बड्या राजकीय नेत्या मंडळींना विठ्ठलाची शासकीय पुजा करता आली नाही.

जाणून घ्या.. किती राजकीय नेते मंडळींना आंदोलनांमुळे पुजेला हजर राहिले नाही…

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना १९९७ मध्ये मुंबई येथील घाटकोपर मधील रमाबाई आंबेडकर नगरमध्ये झालेल्या गोळीबार झाला होता. या घटनेनंतर दलित संघटनांनी मनोहर यांच्या विरोधात मोठे आंदोलन पुकारले होते. यांचे तीव्र पडसात पंढरपुरातील आषाढी यात्रेवर पडले होते. यामुळे मनोहर जोशी यांना पंढरपूरातील विठ्ठलाची पुजा करता आली नव्हाती. मनोहर जोशी यांच्या काळातील राज्याचे मुख्य सचिवांनी ही पूजा केली होती.

माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ बंडा तात्या कराडकर यांच्या आंदोलनानंतर पूजेला जाणे रद्द केले यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडकर यांनी पंढरपुरातील शिवाजी चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविला होता. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना पुजेला जाता आले नाही.

Related posts

राज ठाकरे यांनी कट-पेस्ट करुन लोकांची दिशाभूल करु नये !

News Desk

“…मग हे संकट काहीच नाही,” उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला टोला

Aprna

तुम्ही कोणीही सुनावणीसाठी लायक नाही !

News Desk