HW News Marathi
महाराष्ट्र

“आता मला वाटतं की आम्ही एकही सामना गमावणार नाही”, मोटेरा स्टेडियमवरुन मुख्यमंत्र्याचा टोला

मुंबई | अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी केल्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे. ते आज (३ मार्च) विधानसभेत म्हणाले की, आता मला वाटते की भारतीय संघ एकही सामना गमावणार नाही, कारण स्टेडियमचे नाव बदलण्यात आले आहे.उद्धव ठाकरे म्हणाले की, “वीर सावरकरांवर भाजप खूप प्रेम दाखवत आहे. सावरकरांना भारतरत्न देण्यात यावे यासाठी केंद्र सरकारला दोन वेळा पत्र पाठविण्यात आले होते. तरीही सावरकरांना भारतरत्न का दिलं नाही? याचं उत्तर त्यांनी द्यावं.

ते पुढे म्हणाले की, भाजप सर्व महापुरुषांना आपले म्हणत आहे. सरदार वल्लभभाई पटेल असो वा सावरकर. “आता मला वाटतं की आम्ही एकही सामना गमावणार नाही, कारण स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी करण्यात आले आहे. आम्ही विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर ठेवले आहे आणि त्यांनी सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलले आहे. ते पुढे म्हणाले, की “आम्हाला तुमच्याकडून हिंदूत्व शिकण्याची गरज नाही. आम्ही औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करणारचं, अशी आम्ही आपल्याला खात्री देतो.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात, कोरोना योद्ध्यांना केले अभिवादन

News Desk

केजरीवाल ध्यानधारणेसाठी इगतपुरीत

News Desk

पेट्रोल २ रूपयांनी तर डिझेल १ रूपयांनी होणार स्वस्त

News Desk