HW News Marathi
महाराष्ट्र

आता ‘सरकारच्या संकटमोचन’ संजय राऊतांनी धावून यावे !, शेलारांची टीका

मुंबई | राज्यातील ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात वारंवार कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून मतभेद समोर येत आहेत. नुकताच राज्यातील विद्यापीठाच्या अंतिम परीक्षांसंदर्भातील निर्णयाच्या पार्श्वभूमीवर यात वाद निर्माण झाला. याच विषयावरून एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना टोला लगावला. “सध्याच्या आपत्कालीन स्थितीत परीक्षा नव्हे तर शिक्षण सुरू राहणे आवश्यक आहे”, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांवर टीका केल्याने आता महाराष्ट्र भाजपकडून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्यात आला आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतात ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. “मुख्यमंत्री म्हणतात, परिक्षांपेक्षा शिक्षण महत्त्वाचे पण शाळा कशा व कधी सुरु होणार? माहित नाही. मुख्यमंत्री जाहीर करतात, अंतिम वर्षे पदवी परिक्षा रद्द, पण अद्याप लेखी आदेश नाही. त्यामुळे विद्यापीठांत परिक्षांची तयारी सुरु! शिक्षणाचा महाराष्ट्रात असा “गोंधळात गोंधळ”!”,असे ट्विट शेलार यांनी केले आहे.

“मुख्यमंत्री परिक्षा रद्द केल्याचे जाहीर करतात तर वैद्यकीय शिक्षणमंत्री परिक्षा घ्या म्हणून राज्यपालांना जाऊन भेटतात…बार कौन्सिल ऑफ इंडिया म्हणते परिक्षा घ्यावीच लागेल. कुलपती म्हणून राज्यपालांना काहीच अवगत केले जात नाही.महाराष्ट्रात शिक्षणाचा असा “गोंधळात गोंधळ”!”, असे शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. आशिष शेलार यांनी यासंबंधी सलग ४-५ ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह, राज्यातील सरकार त्याचप्रमाणे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे. “कोरोनामुळे भयभीत विद्यार्थी, पालकांचा धोक्यात आलेला नोकरी-धंदा..त्यात सरकारचा “गोंधळात गोंधळ”..दुर्दैवाने विद्यार्थी तणावात.. आता तरुणांचे भविष्य वाचवण्यासाठी “सरकारचे संकटमोचन” संजय राऊत तुम्हीच धावून या! चला तरुणांचे भविष्य वाचवू या! अन्यथा संघर्ष करावाच लागेल”, असे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे.

राज्याच्या राज्यपालांच्या हस्ते गुरुवारी (११ जून) मुंबईतील के. सी. महाविद्यालय, एच. आर. वाणिज्य महाविद्यालय व बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज यांचा समावेश असलेल्या हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट (एचएसएनसी) समूह विद्यापीठाचे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला ठाकरेही उद्धव ठाकरेही उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान, मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये ही टोलेबाजी पाहायला मिळाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याबाबत आपल्याला काहीच माहीत नाही,’ अशोक चव्हाण

News Desk

एअर इंडियाला येणार ‘अच्छे दिन’?; सरकारने टाटांची बोली स्वीकारली, लवकरच होणार मालकी हस्तांतरण

News Desk

वैद्यनाथ कारखान्याच्या चोरी प्रकरणातराष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीचा हात असल्याचे निष्पन्न!

News Desk