HW News Marathi
महाराष्ट्र

नरेडकोचा १ लाख ५० हजार झाडे लावण्याचा संकल्प

मुंबई | पर्यावरणाचे जतन आणि प्रसार करण्याच्या हेतूने, नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल महाराष्ट्रने वृक्षारोपण आणि संरक्षण मोहीम संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली येथे आयोजित केली होती. अमृता फडणवीस यांच्या हस्ते या मोहिमेचे उदघाटन करण्यात आले. यंदा नरेडकोने १ लाख ५० हजार झाडे लावण्याचा संकल्प केला.

या वेळी अमृता फडणवीस म्हणाल्या, “हा खूप चांगला उद्देश आहे आणि आपण जास्तीत जास्त झाडं लावायला हवीत आणि त्या झाडांचे संगोपन ही केले पाहिजे. मी खूप आभारी आहे नरेडकोची की त्यांनी मला इतक्या चाांगल्या मोहिमेचे उदघाटन करण्यासाठी आमंत्रित केले. नरेडको महाराष्ट्राने नेहमीच पर्यावरण संरक्षण, सामाजिक बांधिलकी आपण मुंबईतील पर्यावरणाची काळजी घेतली आहे. ही मोहीम झाडे लावण्यासोबतच त्यांचे संगोपन करण्याचाही संदेश देते. मुंबई महानगरपालिका व वन पर्यावरण विभाग आणि नरेडको यांच्या संयुक्त विद्यमनाने ही मोहीम राबवली जात आहे. या वृक्षारोपण कार्यक्रमात निरंजन हिरानंदानी, राजन बांदेलकर व अन्य सहकारी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी महामंडळाचा ३० टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव

News Desk

मुस्लिमांना खूश करण्यासाठी राम मंदिराबद्दल वक्तव्य केलं का? दरेकरांचा पवारांना सवाल

News Desk

दुर्दैवाने महाराष्ट्रात ब्लू फ्लॅगचा अभिमान बाळगावा असा एकही समुद्रकाठी नाही, सत्यजित तांबेंची आदित्य ठाकरेंकडे नाराजी

News Desk