HW News Marathi
Covid-19

राज्यात नव्या कोरोनाबाधितांचा आकडा घटला, मृतांचा आकडा चिंताजनक

मुंबई । राज्यातील कोरोना रुग्णसंख्या लक्षणीय प्रमाणात घटत आहे. राज्याच्या आरोग्यविभागाने आज (२५ मे) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात २४ हजार १३६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. दरम्यान, एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा जरी कमी होत असला तर मृतांचा आकडा मात्र चिंता वाढवणाराच आहे.

गेल्या २५ तासांत राज्यात तब्बल ६०१ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. निश्चितच हा आकडा शासन प्रशासनाची चिंता वाढवणारा आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण ९० हजार ३४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एक दिलासादायक बाब म्हणजे राज्याचा रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण थेट ९२.७६ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण ३ लाख १४ हजार ३६८ रुग्ण विविध विविध रुग्णालयांत कोरोनावर उपचार घेत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pravin Darekar HW Exclusive : उद्धव ठाकरे संवेदनशील आहेत !

News Desk

कुणाच्याही रोजी-रोटीवर निर्बंध आणावेत अशी इच्छा नव्हती, पण…! | मुख्यमंत्री

News Desk

आनंदाची बातमी ! देशातील ‘हे’ राज्यही कोरोनामुक्त

News Desk