HW News Marathi
Covid-19

राष्ट्रवादीच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्ताने ‘राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय’ अभियानाला उद्यापासून सुरुवात

मुंबई | येत्या १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्षात पदार्पण करत असून याच निमित्ताने प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ‘राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय’ या अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानांतर्गत राज्यभरातील जवळपास ५ लाख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जाणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत आज ( २१ मे) दिली. ‘राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय’ अभियानांतर्गत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी ‘महासंवाद’ करणार आहेत. यावेळी जयंत पाटील हे जवळपास ५ लाख पदाधिकाऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधतील.

राज्यात महाविकासआघाडी सरकार येऊन जवळपास ६ महिने पूर्ण झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाविकास आघाडी सरकारचा प्रमुख घटक आहे. गेल्या दोन महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कोरोनाच्या या संकटकाळात तळागाळातील लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याचे काम करत आहे. काही दिवसांनी कोरोनाचे संकट संपेल तसेच राज्य पूर्वपदावर येईल त्यानंतर काही समस्या उद्भवतील या समस्यांचे निवारण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पुन्हा जोमाने कामाला लागतील. लोकांपर्यंत मदत पोहोचवताना कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी, प्रश्न, मनोगत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ‘राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय’ या अभियानांतर्गत जाणून घेणार आहेत. या अभियानाची इत्यंभूत माहिती पक्षश्रेष्ठींकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

येत्या २२ मे २०२० रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून हे अभियान सुरू केले जाणार आहे असे जयंत पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षासाठी झटला आहे, पक्षाचे जे काही वैभव आहे ते कार्यकर्त्यांमुळेच आहे म्हणून त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. कार्यकर्ते आहेत म्हणून पक्ष आहे असे मत जयंत पाटील यांनी यावेळी मांडले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात गेल्या ६ दिवसांत तब्बल ४ लाख ४२ हजार रुग्ण झाले कोरोनामुक्त !

News Desk

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

News Desk

राज्यात १ हजार ६३२ नवीन करोनाबाधित, ४० रूग्णांचा मृत्यू

News Desk