HW News Marathi
महाराष्ट्र

….त्याच दिवशी संजय राठोडने पूजाला ४५ फोन केले होते !, चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप

पुणे | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात भाजप चांगलाच आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आता एक मोठा आणि गंभीर आरोप केला आहे. “ज्या दिवशी पूजा चव्हाणने आत्महत्या केली त्याच दिवशी संजय राठोड यांनी पूजाला तब्बल ४५ फोन केले होते. अरुण राठोडने पोलिसांच्या १०१ या क्रमांकावरून याबाबतची कबुलीही दिली होती”, असा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे. त्याचप्रमाणे, १०१ क्रमांकावरून त्यावेळी झालेले अरुण राठोड यांचे संभाषण जाहीर करून त्यांच्या चौकशीची मागणीही चित्रा वाघ यांनी केली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चित्रा वाघ यांनी अनेक सवाल आणि शंका उपस्थित केल्या आहेत. त्याचप्रमाणे, पूजा चव्हाणने आत्महत्या केलेल्या पुण्यातील ठिकाणाची देखील चित्रा वाघ यांनी पाहणी केली आहे. वानवडी पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी पोलिसांसोबत चर्चा देखील केली. यावेळी चित्रा वाघ पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करत पुणे पोलीस हे प्रकरण झाकत असल्याचा गंभीर आरोप देखील यावेळी चित्रा वाघ यांनी केले आहे. अरुण राठोडने पोलिसांच्या १०१ क्रमांकावर फोन करून पोलिसांकडे कबुली दिली असून पोलिसांनी त्याची चौकशी करावी, अशी मागणीही चित्रा वाघ यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“संन्यास घेतील फडणवीसांचे दुष्मन!”, शिवसेनेचा जोरदार वार

News Desk

परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज स्विकारण्याला 30 जून पर्यंत मुदतवाढ!

News Desk

आता बघू, बाळासाहेबांचा शब्द महत्त्वाचा की सत्तेची लाचारी! राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

News Desk