HW News Marathi
महाराष्ट्र

जयंत ससाणे यांच्या निधनाने सच्चा काँग्रेस कार्यकर्ता हरपलाः अशोक चव्हाण

मुंबई श्रीरामपूरचे माजी आमदार व अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जयंत ससाणे यांच्या निधनाने सच्चा काँग्रेस कार्यकर्ता हरपला, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

जयंत ससाणे यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना खा. चव्हाण म्हणाले की, ससाणे आयुष्यभर काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहिले. अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. जिल्ह्यात काँग्रेस पक्ष अधिक बळकट व्हावा म्हणून त्यांनी मोलाचे योगदान दिले. श्रीरामपूर नगरपालिकेचे अध्यक्ष, विधानसभा सदस्य म्हणून श्रीरामपूर आणि परिसराच्या विकासासाठी ते कायम आग्रही राहिले. साईबाबा संस्थान शिर्डीचे अध्यक्ष असताना शिर्डीत मोठ्या प्रमाणात विकास कामे करून साईभक्तांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले.

जयंत ससाणे यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ससाणे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘फडणवीस सरकारचे चिठ्ठे बाहेर आले तर फडणवीसही अडचणीत येतील’, पटोलेंचा गौप्यस्फोट

News Desk

आजारपणाला कंटाळून रुग्णाची आत्महत्या

News Desk

“सुप्रिया सुळे, नीलम गोऱ्हे, यशोमती ठाकूर हरवल्या, शोधणाऱ्यास ५०० रुपये बक्षिस देऊ” भूमाता ब्रिगेडचा स्टंट

News Desk