HW News Marathi
Covid-19

…त्यानंतरच आम्ही १०० युनिट वीज माफ करण्याचा निर्णय घेऊ ! ऊर्जामंत्र्यांचा निशाणा 

मुंबई | कोरोना काळात सर्वसामान्यांना आलेल्या अवाजवी वीजबिलांच्या पार्श्वभूमीवर एकीकडे राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. तर दुसरीकडे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज (२० नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. “मी राज्यातील जनतेला १०० युनिट वीज माफी देण्याच्या घोषणेवर अजूनही ठाम आहे. मात्र, पूर्वीच्या सरकारने जे पाप करून ठेवले आहे. त्याचे आधी निरसन करावे लागेल. ते झाल्यानंतरच १०० युनिट वीजमाफी देण्याचा निर्णय घेण्यात येईल”, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे. नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन विद्युत विभागाच्या आर्थिक स्थितीची माहिती दिली आहे.

“मी १०० युनिट वीज माफीच्या घोषणेवर आजही ठाम आहे. त्यासाठी अभ्यासगटाची समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, मधल्या काळात कोरोना आल्याने या अभ्यासगटाच्या बैठका झाल्या नाहीत. त्यामुळे समितीचा अहवाल आला नाही”, असेही सप्ष्टीकरण यावेळी नितीन राऊत यांनी दिले. “महावितरणची मार्च २०१४ ची अखेरची थकबाकी १४ हजार १५४ कोटी होती. ही थकबाकी आता ५९ हजार १४ कोटी इतकी आहे. याच विषयावर काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी याबाबतच्या चौकशीचे आदेश दिले आहेत”, अशीही माहिती यावेळी नितीन राऊत यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील नेस्को कोविड सेंटरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा ‘झिंगाट’ डान्स

News Desk

देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच!

News Desk

मुंबई पोलिसांच्या नव्या आदेशात २ किलोमीटरच्या ‘लक्ष्मणरेषे’चा उल्लेख नाही

News Desk