HW News Marathi
महाराष्ट्र

आमच्या १२ आमदारांच्या निलंबनाविरोधात कोर्टात जाणार ! चंद्रकांत पाटलांचा इशारा

मुंबई । भाजपच्या १२ आमदारांवरील निलंबनाच्या कारवाईच्या निषेधार्थ भाजपने विधानसभेबाहेर प्रतिविधानसभा भरवली होती. यावेळी सरकारच्या निषेधाच्या ठरावावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी सांगितलं की, “शिवी भास्कर जाधव यांनीच दिली होती. पण आमच्या आमदारांविरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या विरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत. खोटं कसं बोलावं हे या सरकारकडूनच शिकलं पाहिजे”, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी आज (६ जुलै) लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, “आमच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना शिवी दिली नाही. भास्कर जाधव यांनीच शिवी दिली आणि कारवाई आमच्या आमदारांवर करण्यात आली, असं सांगतानाच आमच्या १२ आमदारांना निलंबित केल्याच्या विरोधात आम्ही कोर्टात जाऊन दाद मागणार आहोत”, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांना दिली आहे.

“मराठा समाजाला भाजपने आरक्षण मिळवून दिलं. पण या सरकारला हे आरक्षण टिकवता आलं नाही. पवार साहेब सामान्य नागरिकांना आरक्षण हवं आहे. शाळा, महाविद्यालये तुमची आहेत. मग मराठा समाजाला प्रवेश का दिला जात नाही?”, असा सवाल करतानाच “तुम्ही तुमच्या मुलीला राजकारणात पुढे न्याल. उद्धव ठाकरे त्यांच्या मुलाला पुढे नेतील, पण सामान्य माणसांचे काय?” असाही सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.

अजित पवारांनी काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपदाचं लॉलीपॉप दिलं !

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरूनही चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. हिंमत असेल तर गुप्त मतदानाने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्या, असं आव्हानच चंद्रकांत पाटील यांनी दिलं. अजित पवार यांनी काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपदाचं लॉलीपॉप दिल्याची टीकाही त्यांनी केली. हे सरकार आम्हाला प्रतिविधानसभा भरू देत नव्हते, असंही ते म्हणाले. या सरकारने २३ हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या मंजूर करून घेतल्या”, असेही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंगणघाटमधील मृत बहिणीला वाचवू शकलो नाही !

swarit

पेंग्विनच्या ‘ऑस्कर’ नावावरून भाजप आक्रमक; चित्रा वाघ यांनी शिवसेनेला फटकारल

Aprna

देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले तर पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील घराबाहेर पडतील!

News Desk