HW News Marathi
महाराष्ट्र

महविकासआघाडीने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही !

मुंबई | हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या शेतकऱ्यांना २ लाखपर्यंतचे कर्जमाफ करण्याचा निर्णय घेतला आहे. “महविकासआघाडीने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते,” असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केला आहे. फडणवीस पुढे म्हणाले की, “आम्ही ३४ हजार कोटींची कर्जमाफी केली होती, बँकांमार्फत व्हेरिफिकेशन केले, त्यानंतर १९ हजार कोटी वितरित देखील केले आहेत. या तिन्ही पक्षांनी सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, ते पाळले नाही म्हणून, तोंडाला पाने पुसली, असे म्हणाले.”

मी भविष्यकार नाही, पण अशा प्रकारचे सरकार कधीच कोणत्या राज्यात चाललेले नाहीत. हे सरकारही त्याला अपवाद ठरणार नाही, असे म्हणत फडणवीसांनी महाविकासआघाडीच्या सरकारवर प्रश्न चिन्हा उपस्थित केले आहे. फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना २५ हजार हेक्टरी देऊ अशी घोषणा केली होती. मात्र, राष्ट्रपती राजवटीत केलेली मदत सोडली तर ठाकरेंनी कोणतीही मदत केली नाही. असा आरोप फडणवीसांनी आज (२३ डिसेंबर) पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलताना केला.

दरम्यान, राज्याच्या तिजोरीत पैसे नाहीत. मात्र इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे फडणवीसांनी सागंतिले. राज्याचे सकल उत्पन्न १५.८ टक्के आहे. ऋणभार कमी असून महसूल तूट मर्यादेत आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. गचा आरोप हास्यास्पद असल्याचेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. ‘ऑडिटमध्ये दिलेले पैसे हे वापरल्यावर पत्र द्यावे लागते. जर ते आले नाही तर कॅग त्यावर आक्षेप घेऊ शकते. मला फायनान्स समजत असल्यामुळे यापूर्वी कधीही आक्षेप घेतला नाही,” असे फडणवीस म्हणाले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

News Desk

‘रुपाली चाकणकरांना ओळखत नाही’, नवनीत राणांचं प्रत्युत्तर..!

News Desk

तरुणांना संमोहित करून कट्टरवादी बनविण्याचा सनातनचा कट – सीबीआय

Gauri Tilekar