HW News Marathi
महाराष्ट्र

UP च्या विजयासाठी ओवैसी आणि मायावतींना पद्मविभूषण, भारतरत्न द्यावा; राऊतांचा भाजपला टोला

मुंबई | “उत्तर प्रदेशात भाजपच्या विजयात ओवैसी आणि मायावतींचे मोठे योगदान आहे, हे मान्य करावे लागेल. त्यामुळे त्यांना तुम्ही पद्मविभूषण, भारतरत्न द्यावा लागेल,” असाटोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. देशातील पाच राज्यांपैकी चार राज्यात भाजपचे सरकार आले आहे. या पार्श्वभूमीवर राऊत पत्रकारांशी बोलताना भाजपच्या विजयावर अप्रत्यक्ष टोला लगावाल आहे. 

राऊत म्हणाले, भाजपला मोठा विजय मिळाला आहे. उत्तर प्रदेशात भाजपचे राज्य होते. पण, अखिलेश यादव यांच्या जागा गेल्या वेळच्या तुलनेत तीन पट वाढल्या आहेत. भाजपच्या विजयात मायावती आणि औवेसींचेही योगदान आहे. आणि त्यामुळे त्यांना तुम्ही पद्मविभूषण, भारतरत्न द्यावा लागेल. आम्ही खूश आहोत, संसदीय राजकारणात तर हारजीत होत असते. गोवा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजप जिंकले आहे. आम्ही तुमच्या आनंदात सहभागी आहोतच. तर उत्तराखंडमध्ये भाजपचे मुख्यमंत्री का हरले?, असा सवाल त्यांनी भाजपला केला आहे

 चार राज्यांच्या निवडणुकीचा आणि मुंबई महापालिका निवडणुकीशी कोणताही संबंध नाही. गेल्या ५० वर्ष आम्ही महापालिका लढतोय. पालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा कायम राहणार, असा दावा राऊतांनी केला.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वीडनबरोबर भागीदारीसाठी महाराष्ट्र कटिबद्ध! – उपमुख्यमंत्री

Aprna

#CoronaVirus : ‘लॉकडाऊन’चे पालन केले नाही, दिसताक्षणी गोळी मारण्याचा निर्णय घ्यावा लागेल !

swarit

ऊसतोड बांधवांसाठी खुशखबर, स्वगृही परतण्याचा मार्ग खुला !

News Desk