HW News Marathi
महाराष्ट्र

‘तुम्हीच खरे देशभक्त’, असदुद्दीन ओवैसी यांची मोहन भगवंतांवर टीका

नवी दिल्ली | भारताने आत्मनिर्भर बनावं अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची इच्छा होती. नोटाबंदीने भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याची खरमरीत टीका खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारवर केली आहे. तर, ‘तुम्हीच खरे देशभक्त’ असं म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला आहे. चीनचे सैन्य भारताच्या हद्दीत घुसून बसले आहेत, हे खरे देशभक्त या नात्याने भागवत यांनी मान्य करावे, असं ओवैसी म्हणाले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांची विचारसरणी आरएसएसची आहे, ते चीन विरोधात चकार काढायलाही घाबरतात. त्यामुळे जर भागवत हे खरे देशभक्त आहेत तर, त्यांनी सर्वांसमोर येऊन चीनी सैन्याने भारतात घुसखोरी हे मान्य करावं, असं आव्हान त्यांनी भागवतांना दिलं आहे.

आपण चीनवर विसंबून राहायला नको

ओवैसींनी मोहन भगवंतांवर टीका केली आहे. “मोहन भागवत म्हणतात की कोणत्याच गोष्टीसाठी आपण चीनवर विसंबून राहायला नको. मग भारतात नोटाबंदी करून देशाची अर्थव्यवस्था कोणी उद्ध्वस्त केली?, देशातील आर्थिक स्थितीला कोण जबाबदार आहे?, केवळ आणि केवळ मोदी सरकार जबाबदार आहे. करोना महामारीत मोदी सरकारनं जनतेसाठी आणलेल्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालंय. मोहन भागवत तुम्हाला देशातील जनतेची ही स्थिती बघवत आहे का, असा सवाल करत भागवत यांचं विधान बोगस आहे,” अशी टीका ओवैसींनी केली आहे.

मोहन भागवत काय म्हणाले?

“देशाने आत्मनिर्भर व्हायला हवं. आपण जेवढं आत्मनिर्भर असू तेवढेच सुरक्षित असू. आपण किती कमवतो यावर आपलं राहणीमान निर्भर नसावं तर, आपण किती कर भरतोय यावर निर्भर असावं,” असं मोहन भागवत एका कार्यक्रमात म्हणाले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्याची श्रुती श्रीखंडे ‘कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ परीक्षेत देशात पहिली

swarit

‘मुंबईतील नुकसानग्रस्तांना देखील मदत करा’, अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांना मागणी

News Desk

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १२९७ वर, गेल्या २४ तासांत १६२ नव्या रुग्णांची भर

News Desk