HW News Marathi
देश / विदेश

पडळकरांचा राऊतांना सवाल…”ही मराठी माणसं वाटत नाहीयेत का”?

मुंबई | महाराष्ट्राच्या मतदाराने युतीला बहुमत दिले. पण नंतर तुम्ही मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला. पाकिस्तानचे आणि कलम ३७० चे गोडवे गाणाऱ्यांसोबत सत्तेचा मेवा तुम्ही खाताय. हे बेळगावलाच नाहीतर अखंड हिंदुस्थानाला समजले आहे. दिल्लीतल्या मॅडमला आणि युवराजांना सत्तेसाठी खुश करण्यासाठी तुम्ही वारकऱ्यांना गुन्हेगार ठरवून मराठीजणांचा सन्मान असलेल्या वारीवर दंडुकशाहीचा वापर केला, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

मराठी माणसाचा एवढा आकस का?

बेळगाव महापालिकेवरुन भाजपवर हल्लाबोल करणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी घणाघात केला. शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले नाहीत म्हणून ते मराठीच राहिले नाहीत का ? मराठी माणसाचा एवढा आकस का? असे प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी विचारले आहेत. मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही, असा संताप बेळगावच्या भाजपच्या विजयावर संजय राऊतांनी व्यक्त केला होता. त्याला पडळकरांनी उत्तर दिलं.

हिंदू सण आले की तुम्ही निर्बंध लादता

वारकऱ्यांच्या खांद्यावरून भगवा पताका उतरवला. त्यांचाच शाप व तळतळाट तुम्हाला आता इथूनपुढेही भोगावा लागणार आहे.किंबहूना आपला पराभव म्हणजे बेळगावच्या मराठी माणसाने तुमच्या १५ कोटीच्या ‘पेंग्वीन ‘ विकासाचा मॉडेल नाकारले आहे. हिंदू सण आले की तुम्ही निर्बंध लादता व इतरांचा सणासुदीला सत्तेसाठी मुजरे करता अशा तुमच्या पाखंडी वृत्तीचा बुरखा फाटलाय आणि तुमचा खरा चेहरा प्रत्येक हिंदूच्या पुढे उजळून आलाय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्तीसगढमध्ये ८ नक्षलवाद्यांना अटक

News Desk

नीरव मोदीला पुन्हा एक मोठा दणका

News Desk

आज पुन्हा एकदा रात्री ८ वाजता पंतप्रधान जनतेला संबोधित करणार

swarit