HW News Marathi
महाराष्ट्र

धान संशोधक दादाजी खोब्रागडे यांचे निधन

चंद्रपूर | तांदळाच्या नऊ जातीचा शोध लावणाऱ्या कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले. खोब्रागडे हे गेल्या काही महिन्यांपासून अर्धांगवायू या दुर्धर आजाराशी झुंज देत होते. चंद्रपुरातील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. खोब्रागडे यांना आज दुपारी त्यांच्या मूळ गावी नांदेड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

खोब्रागडे यांच्याकडे मोजकीच जमीन होती. या जमिनीवर त्यांनी शेतीतील धानावर विविध प्रयोग केले. फक्त तिसरी शिकलेले खोब्रागडे यांनी एचएमटी या प्रसिद्ध अशा तांदळाचा शोध लावला. या तांदळाचा शोध लावून न थांबता. त्यांनी विजय नांदेड, नांदेड ९२, नांदेड हिरा, डीआरके, नांदेड चेन्नूर, नांदेड दीपक, काटे एचएमटी आणि डीआरके टू या नऊ तांदळाचे वाण दादाजी खोब्रागडे यांनी विकसित केले आहे.

  • दादाजी खोब्रागडे यांचा अल्प परिचय

दादाजी रामजी खोब्रागडे यांचे संपूर्ण नाव होते. ते चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड येथील रहिवासी होते. खोब्रागडे यांनी १९८५ ते १९९० या काळात त्यांनी धानाच्या नऊ नवीन वाणांचा शोध लावला. खोब्रागडे यांनी धान संशोधन क्षेत्रातील मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या कार्य बदल फोर्ब्सने २०१० मध्ये जगातील सर्वोत्तम ग्रामीण उद्योजकांच्या यादीत त्यांना मानाचे स्थान दिले होते.

५ जानेवारी, २००५ रोजी अहमदाबाद येथे तत्कालिन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते ५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. तर २००६ मध्ये महाराष्ट्र शासनानेदेखील त्यांना कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एनसीबीच्या कारवाईत १ हजार १२७ किलो गांजा जप्त

News Desk

चंद्रकांत पाटील हे चंपारण्यातील एक पात्र आहेत, वडेट्टीवारांची गंभीर टीका 

News Desk

पावसाळ्यात मुंबईच्या होणाऱ्या ‘तुंबई’वरून नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Aprna